स्त्रियांवर बलात्कार होण्याचे, अन्याय-अत्याचाराचे प्रकार वाढतात तेव्हा अनेक प्रकारची कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक अस्थिरता वाढलेली असते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे भूकमुक्त, भयमुक्त, सुखी कुटुंब या आदर्श चित्राचा ध्यास धरण्याचा व विविध धोरणे व योजना आखून ते चित्र पूर्ण करण्याला दुसरा पर्याय नाही.
↧