आम्ही १९८१ साली डोंबिवलीतल्या टिळक नगरमध्ये राहायला आलो. तेव्हा कुणालाच फारसे ओळखत नव्हतो. त्यामुळे एकप्रकारचं परकेपण आलं होतं. पण आमच्या शेजारच्या शेंडे वहिनींनी मात्र आमचं अवघडलेपण दूर केलं. त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी खूप आपुलकी दाखवली.
↧