गेले काही दिवस जवळपास दररोज मुलींची छेडछाड, त्यांच्यावरील हल्ले, लैंगिक अत्याचाराच्या बातम्या येताहेत. हे घडवणाऱ्यांना कायद्याची जरबच वाटत नसावी, अशी शंका येण्याजोगी स्थिती आहे. पण केवळ कायद्याचा बडगा दाखवून हा प्रश्न सुटणार नाही. महिलांकडे बघण्याची नजर बदलून ती सन्मानाची होईल तो दिवस बदल घडवणारा असेल.
↧