Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गोरीच बायको हवी!

$
0
0

गोरेपणा मिळवून देणाऱ्या क्रीम्सच्या जाहिरातींबद्दल नेहमी बरं-वाईट बोललं जातं. पण, जेव्हा तुम्ही लग्नाला उभे राहता तेव्हा आजही गोरा रंगच महत्त्वाचा ठरतो. हे आमचं नाही, तर लग्न जुळवणाऱ्या काही प्रसिद्ध वेबसाइटचं म्हणणं आहे.

लग्न जुळवायचं असेल, तर चहा-कांदेपोहे या कार्यक्रमाला हल्ली बहुतांश तरुणाई नाकं मुरडताना दिसते. ‘दाखवादाखवी’चा हा कार्यक्रम त्यांना नको असतो. अर्थात, असं असलं तरी आजही ठरवून लग्न जुळवण्याला मात्र त्यांचं प्राधान्य आहे. तसंच, लग्नाला उभं राहताना असलेल्या मुला-मुलींच्या अपेक्षा काळानुसार थोड्या-फार बदलल्या असल्या, तरी गोरेपणाला आजही महत्त्व आहे. अजूनही ९० टक्के मुलांना गोरी बायको असावी असंच प्राधान्यानं वाटतं. ऑनलाइन लग्न जुळवणाऱ्या वेबसाइट्सनी नोंदवलेली ही निरीक्षणं आहेत. एका आघाडीच्या वेबसाइटने तर याबाबत सर्वेक्षण केलं होतं. त्यातून या बाबी आणखी स्पष्ट झाल्या.

तरुण पिढीमध्ये प्रेमविवाहच जास्त होतात असं जर तुम्हाला वाटत असाल तर तसंही नाही. प्रेमविवाहांपेक्षाही ठरवून लग्न करण्यालकडेच तरुणाईचा जास्त कल असल्याचं दिसून येतंय. सबकुछ ऑनलाइनच्या जमान्यात लग्नही वेबसाइटच्या माध्यमातून जुळवली जात आहेत. त्यामुळे लग्न जुळवणाऱ्या वेबसाइट्सची सध्या चलती आहे. एका आघाडीच्या वेबसाइटचे संस्थापक मूरुगवेल जानकीरमन यांच्याशी मुंटानं संवाद साधला असता, विवाहविषयक अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. आजची पिढी पुढारलेली आहे असं बोललं जात असलं तरी सुयोग्य जोडीदार शोधताना गोऱ्या वर्णालाच प्राधान्य दिलं जातं. कारण आपला जोडीदार हा आकर्षक दिसणारा हवा अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि भारतात आकर्षक दिसण्याची व्याख्या ही गोऱ्या रंगापासून सुरू होते. ग्रामीण भागातही या वेबसाइट्सचा वापर होतो असं सांगत, हे प्रमाण ४०% इतकं असल्याचंही ते म्हणाले.

समजूतदारपणा नाही!

नव्या पिढीमध्ये समजूतदारपणाचा अभाव असून जोडीदाराकडून त्यांच्या अपेक्षा जास्त असतात. त्यामुळे भारतात लग्न अयशस्वी ठरण्याचा टक्का वाढत चाललाय. तरुणाईने जोडीदाराला समजून घेतलं तर नक्कीच हे प्रमाण कमी होईल, असं जानकीरमण यांनी सांगितलं. आजची तरुणाई प्रगल्भ विचारांची आहे. भविष्याचा विचार करुन त्या दृष्टीने प्लॅनिंग करण्यावर ते भर देतात. एवढंच नाही तर योग्य वयात लग्न झालं पाहिजे, या विषयावरही ते ठाम आहेत, असंही ते म्हणाले.

तोच विश्वास कायम

आजच्या तरुणाईचा विवाहसंस्थेवर तेवढाच विश्वास आहे जेवढा मागच्या पिढीचा होता. मागच्या पिढीकडून झालेल्या चुकांवरुन आजची पिढी खूप काही शिकतेय. आजच्या पिढीच्या अपेक्षा खूप आहेत, पण त्याचवेळी त्यांच्यात समजूतदारपणाचा अभाव आहे. तो ठेवला तर लग्न अयशस्वी ठरण्याचं प्रमाण निश्चित घटू शकेल.
-मूरुगवेल जानकीरमन, विवाहविषयक वेबसाइटचे संस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>