Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 3450 articles
Browse latest View live

रक्तदान तीन

$
0
0

एक्कावन्न वेळा रक्तदान

रक्तदानाचं महत्त्व माहीत असूनही केवळ गैरसमजुतींमुळे रक्तदान करण्याचं टाळणारेसुद्धा अनेकजण असतात. मात्र, सानपाडा इथे राहणारे महेश नरवडे यांचं उदाहरण आगळंवेगळं ठरावं. भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या महेश यांनी आतापर्यंत एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल एक्कावन्न वेळा रक्तदान करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. 'बी निगेटिव्ह' हा रक्तगट असणाऱ्या ३२ वर्षीय महेश यांना १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाच्यावेळी रक्तदान करण्याची प्रेरणा मिळाली . कॉलेजमध्ये एनसीसीला असताना त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केलं होतं. त्यानंतर त्यांनी अजूनही रक्तदान करणं सुरू ठेवलं आहे. दर तीन महिन्यांनी नियमितपणे रक्तदान करणाऱ्या महेश यांनी मे महिन्यात सायन हॉस्पिटलमध्ये त्यांचं एक्कावन्नावं रक्तदान केलं. लष्करामध्ये कर्तव्य बजावत असताना आर्मी हॉस्पिटलमध्ये तर सुट्टीवर असताना सायन हॉस्पिटलमध्ये रक्तदान करत असल्याचं ते सांगतात. रक्तदानाच्या या समाजसेवेबद्दल महेश यांना महाराष्ट्र शासनाचं 'ग्रीन कार्ड' , तसेच ठाण्यातील रक्तानंद ग्रुपतर्फे 'रक्तकर्ण' पुरस्कार मिळाला आहे.

'परिवर्तन' घडवलं

योग्य त्या रक्तगटाचं रक्त उपलब्ध न झाल्यामुळे काही वेळा रुग्णांवर प्राण गमावण्याची वेळ येते. यावर उपाय म्हणून 'टीम परिवर्तन'नं एक कल्पना लढवली. रक्तगटानुसार वेगवेगळे व्हॉट्सऍप ग्रुप बनवले. जेणेकरून त्या रक्ताची गरज कुठे, कधी आहे याबद्दलची माहिती त्या रक्तदात्यांपर्यंत लवकर पोहोचू शकेल. आणि त्यानुसार रक्तदान करता येईल. सोशल मीडियाचा वापर सोशल वर्कसाठी कशाप्रकारे करता येऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. 'टीम परिवर्तन' हा एक तरुणांचा ग्रुप असून समाजात परिवर्तन घडवून कसं आणता येईल या दृष्टीनं त्यांचं काम सुरू असतं. रक्ताची गरज कुठे आहे त्यानुसार देखील तिथे पोहोचणं सोयीस्कर व्हावं म्हणून विभागांनुसार कल्याण, ठाणे, मुंबई असे वेगवेगळे ग्रुप करण्यात आले आहेत. सर्व ग्रुप्समध्ये जवळपास वीस रक्तदाते सहभागी आहेत. जवळपासच्या ब्लड बँक्सकडे देखील ते तातडीच्या वेळी संपर्क साधतात. 'गरजेच्या वेळी लोकांना मदत व्हावी, या उद्देशातून आम्ही ही कल्पना अमलात आणली', असं अविनाश पाटील यानं सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिंचेची भेंडी घालतेली भाजी!

$
0
0

राजश्री निकम साळवे

पुण्यामधील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत बालपणी घालवलेले ते दिवस मला आजही आठवतात. दहा-वीस नव्हे, तर चक्क दीडशे-दोनशे माणसांचा स्वयंपाक करायला लागायचा संस्थेमध्ये. प्रत्येक मुलीला कामाची जबाबदारी वाटून दिलेली असायची. माझ्या वाट्याला कधी चहा, कधी भाकऱ्या, कधी भात, कधी भाजी, आमटी,,उसळ अशा जबाबदाऱ्या येत. त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्याची सवय लागली. ती आज प्रयत्न करूनही सुटत नाही. चार माणसांचा स्वयंपाक करायला घेतला आणि कितीही ठरवलं, तरी तो नकळतपणे सहा / आठ माणसांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मैत्रिणी गुपचूप कैऱ्या आणायचो. कधी छुंदा, तर कधी पन्हं करायचो आणि दुपार झाली, की खोलीत जाऊन गुपचूप खायचो. यातही वेगळीच मजा होती. या आंबट-गोड आठवणीनं मन भरून येतं. मी उत्तम स्वयंपाक करायचे; पण कधी कधी भारी गमती जमती व्हायच्या. माझा नवरा, मनीषसाठी मी खास भेंडीची भाजी बनवली होती. कारण सांगता येणार नाही; पण कोण जाणे चिंच अधिक पडली होती. आजही मनीष गमतीत म्हणतो, 'राजश्री, चिंचेची भेंडी घातलेली भाजी करशील का?' मनीषला चिकनापेक्षा मासे जास्त प्रिय आहेत. पापलेटचं कालवण, कोळंबी फ्राय, कुरकुरीत तळलेले बांगडे हे त्याचे लाडके पदार्थ आहेत. माझा मुलगा मल्हार खवय्या आहे. त्याला भारतीय, चायनीज, इटालियन, कॉन्टिनेन्टल असे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. त्याच्यासाठी म्हणून मी खास यू-ट्यूबवर जाऊन या पदार्थांची रेसिपी पाहते. आता त्यात तरबेज झाले आहे. कॉन्टिनेन्टल पदार्थाला आपला इंडियन बेस देऊन एखादी फ्यूजन डिश करता येईल का, असेही मी पाहते. पदार्थ पौष्टिक व्हावा, असा माझा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ पास्ता करताना त्याच्यामध्ये चीज किंवा क्रीम कमी टाकून आपल्या भारतीय भाज्या जास्तीत जास्त टाकते आणि त्याचं पोषणमूल्य वाढवते. पिझ्झा करताना मैद्याचा बेस न वापरता नाचणीची भाकरी घेऊन त्याच्या वर भाज्या आणि पिझ्झासाठीचे पदार्थ टाकते. शूटिंगमधून ब्रेक मिळाला आणि घरी असले, की चटणी भरलेलं पापलेट करण्याची मल्हारची फर्माईश असते. मला एकेक पदार्थ निगुतीनं करायला आवडतात. आपल्या माणसांसाठी रांधण्यात वेगळीच मजा असते. स्वतः उत्तम स्वयंपाक करत असल्यामुळे बाहेर जाऊन स्पेशली खायची संधी फार कमी येते, तरीही काही काही ठिकाणं माझी हक्काची आणि लाडकी आहेत. बोरिवली स्टेशनबाहेरचा मंगेश वडापाव, गिरगाव कट्ट्यावरची मिसळ, वालाची खिचडी, दादरच्या आस्वादमधली कुरकुरीत आळू वडी तसंच झुणका-भाकर लोण्याचा गोळा, नमस्कारमधील फिश थाळी माझी फेवरेट आहे. माझी मैत्रिण सोनाली पंडित हिच्या हाताचं मटण खाल्ल्यानंतर जन्माला आल्याच सार्थक होतं. पुण्याला आले की चितळेंकडे बाकरवड्या आणि साखर लावलेले पाकातले गुलाबजाम घेतल्याशिवाय पुण्याच्या बाहेर पाय पडत नाही. बालगंधर्वाच्या प्रयोगांनंतर जोशी काकांकडील सात्विक जेवण मिस करू नये. गोड वरण-भात, बटाट्याची भाजी, उसळी, चटण्या, कोशिंबीर सारंच चवीचं. उपवास असला, की आप्पांकडल्या खिचडीची हटकून आठवण येते आणि त्याबरोबर दाण्याचं कूट पेरलेल्या काकडीच्या कोशिंबिरीची. लुसलुशीत खिचडी आणि खमंग काकडी, हे अफलातून समीकरण मला नेहमीच आवडतं.

चटणी भरलेले पापलेट

साहित्य : दोन मध्यम आकाराची ताजी पापलेट, मूठभर किसलेला ओला नारळ, मूठभर कोथिंबीर, चार हिरव्या मिरच्या, चार-पाच लसूण पाकळ्या, चार काळीमिरी, चमचाभर जिरे, एक लिंबू, चमचाभर हळद व लाल तिखट, चार कोकम, मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : प्रथम पापलेट कापून स्वच्छ करून त्याला हळद, मीठ, कोकम, लाल तिखट लावून वीस मिनिटं ठेवून द्यावं. ओलं खोबरे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, काळीमिरी, हिरव्या मिरच्या एकत्र करून, त्याचं बारीक वाटण वाटून घ्यावं. मॅरीनेट केलेल्या पापलेटामध्ये हा मसाला भरून दोरीनं अलगद बांधावं. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घेऊन दोन्ही बाजूनं सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करावं.

शब्दांकन : निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढणे एक कला

$
0
0

पुणे टाइम्स टीम

'अगं राणी, वाढणाऱ्याच्या उजव्या हाताला मीठ, चटणी, कोशिंबीर वाढायचं असतं. लग्नाला तीन वर्षं झाली तरी पान काही वाढता येत नाही अजून,'

हा संवाद आपल्याही सवयीचा. सुगरण असणाऱ्या अनेकींची ताट वाढताना गडबड होते. मग भाजीचा रस्सा चटणीत आणि वरणामध्ये भिजलेले पापड, या गोष्टी अगदी ठरलेल्या. याच गोष्टी टाळण्यासाठी या खास टिप्स...

१. जेवण वाढताना नक्की काय करायचं आणि काय टाळायचं?

जेवायला बसल्यावर सगळ्यांत आधी लक्ष वाढलेल्या ताटाकडे जातं. स्वयंपाक ही एक कला आहे, असं म्हणतात; पण पोट आणि मन दोन्ही भरण्यासाठी ते पुरेसं नक्कीच नाही. ताट वाढण्याची पद्धत आणि सुटसुटीत टेबल यामुळे तुमचं जेवण अधिक रुचकर होऊ शकतं. पाहुण्यांच्या ते कायम लक्षात राहू शकते. पदार्थ कितीही उत्तम चवीचे असले, तरी ताटात गर्दी झालेली असली आणि पदार्थ एकमेकांत मिसळले असतील, तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. घरी जेवत असा किंवा हॉटेलमध्ये, वाढण्याची पद्धत ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यामुळे पाहुण्यांना आणि खरंतर तुमच्या कुटुंबीयांनासुद्धा वाढताना काही गोष्टी कायमच लक्षात ठेवायला हव्यात.

२. हे विसरून चालणार नाही.

पाणी हा अगदी न टाळण्यासारखा भाग आहे; त्यामुळे सगळ्यांत आधी ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना जेवण्याआधी एक घोटभर पाणी पिण्याची सवय असते. पाण्यालाही चव आणण्यासाठी त्यात जरासं लिंबू आणि पुदिना टाकता येईल. त्यामुळे पाण्याला वेगळी चव मिळेल आणि जेवण पचण्यासाठीही मदत होईल.

३. अतिथी देवो भव!

अतिथीचं स्वागत करणं, त्यांना सन्मान देणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य समजलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम जेवण वाढून संतुष्ट करणं, ही महत्त्वाची गोष्ट ठरते. आलेल्या पाहुण्यांना आरामशीर आणि पोटभर जेवता आलं, की ते एकंदरच खूष होतात. जेवणाच्या चवीबरोबरच तुम्ही केलेलं आतिथ्यही ते विसरणार नाहीत.

४. लक्ष वेधणारी कटलरी

जे पदार्थ करत आहात, त्याला योग्य आणि आवश्यक अशी कटलरीची मांडणी हवी. कटलरीला जुनी परंपरा लाभली आहे. ती एक संस्कृतीच बनून गेली आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

५. पदार्थांची योग्य मांडणी

तुम्ही तयार केलेले रुचकर पदार्थ योग्य रीतीनं वाढलेत, तर त्याची चव आणखी वाढते. प्रत्येक पदार्थाची वेगळी मांडणी, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. सूप बाउल्सपासून गोडाच्या वाट्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळ्या समोर आल्यास पाहुण्यांसाठी तो नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

६. पसारा नको

जास्तीची ताटं किंवा वाट्यांचा पसारा झाल्यास एखाद्याचा जेवणाचा मूड जाऊ शकतो. त्यामुळे जितके लोक जेवणार आहेत, त्यांना आवश्यक तितक्याच गोष्टी मांडून ठेवा.

७. पदार्थांनुसार क्रोकरीची निवड

चुकीचे पदार्थ चुकीच्या ताटांमध्ये किंवा वाट्यांमध्ये वाढले, तर कसं वाटेल? नूडल्स खाताना साधा चमचा आणि आइस्क्रीम खाताना काटा-चमचा, असं असल्यास कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे जे पदार्थ करणार आहात, त्यानुसार क्रोकरीची मांडणी हवी. केलेले पदार्थ खाण्यासाठी योग्य अशा गोष्टी असल्या, तर जेवणाचा आनंद वाढतो.

८. बच्चेकंपनी खूष होईल

तुम्ही वाढदिवस किंवा लहान मुलांच्या कार्यक्रमांसाठी पार्टीचं आयोजन करत असाल, तर नक्कीच त्यांना खूष करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना आवडणारे गडद आणि गोंडस, आकर्षक असे रंग क्रोकरीसाठी निवडा. याचसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या रंगांचा, कार्टून्सचा उपयोग या मांडणीमध्ये करता येईल. एकदा मन खूष झालं, की पोट भरायला वेळ लागत नाही.

९. पदार्थांची सजावट विसरू नका

प्रत्येक पदार्थ हा कसा लागतो, याचसोबत तो कसा दिसतो, हेदेखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक पदार्थाची सजावट विशिष्ट पद्धतीनं करता येते. डोळ्यांना सुंदर दिसणारे पदार्थ चवीबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. त्यामुळे कोणतेही पदार्थ बनवताना त्यांना चविष्ट आणि देखणं बनवायचं आहे, हे लक्षात घ्या.

१०. टिशू आणि नॅपकिन तितकेच गरजेचे

पदार्थांची चव, सजावट याचसोबत जेवणाचा एकंदर अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. केवळ रुचकर पदार्थ पानात वाढून चालत नाही, तर टेबलाची साधीच; पण साजेशी सजावट देखील गरजेची असते. याबरोबर योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात टिशू पेपर्स आणि नॅपकिन्स ठेवल्यास गडबडीच्या वेळाही टाळता येऊ शकतात.

संकलन : अनुजा मुळे, कॉलेज क्लब रिपोर्टर, आय.एल.एस.लॉ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनारसे संपले

$
0
0

ही गोष्ट १९७०ची आहे. त्यावेळी मी सहकारनगरमधील एका बंगल्यातील एक खोली आणि व्हरांडा असलेल्या जागेत राहत होतो. पुष्कळ मित्रमंडळी आमच्या घरी येत असत. त्यांची आम्हाला कधीच अडचण झाली नाही. त्या वर्षी दिवाळीसाठी पत्नीनं फराळ केला होता. मला आवडतात म्हणून स्टीलचा मोठा डबा भरून अनारसे केले होते. रात्री दहा वाजता जवळच राहणारे माझे मित्र बारटक्के आणि त्यांच्या पत्नी आले. आमचं स्वयंपाकघर, झोपण्याची खोली, बैठकीची खोली सगळं एकच होतं. आम्ही गप्पा मारत बसलो. माझ्या हाताजवळच अनारशाचा डबा होता. मी त्यातील एक अनारसा काढून बारटक्केंच्या पुढे धरला. त्यांना अनारसा आवडत नव्हता. मग वहिनींना विचारलं, तर त्या जेऊन आल्या असल्यामुळे नको म्हणाल्या. शेवटी मीच तो अनारसा खाऊन टाकला. तो संपल्यावर दुसरा अनारसा काढला. एकीकडे आमच्या गप्पा रंगत होत्या आणि दुसरीकडे तो डबा रिकामा होत होता. रात्री १ वाजता ते दोघं आपल्या घरी जाण्यासाठी उठले. त्यापूर्वी सगळा डबा रिकामा झाला होता. त्यावर्षीची दिवाळी अनारशाशिवायच गेली.

शरद बापट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिंचेची भेंडी घालतेली भाजी!

$
0
0

राजश्री निकम साळवे

पुण्यामधील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत बालपणी घालवलेले ते दिवस मला आजही आठवतात. दहा-वीस नव्हे, तर चक्क दीडशे-दोनशे माणसांचा स्वयंपाक करायला लागायचा संस्थेमध्ये. प्रत्येक मुलीला कामाची जबाबदारी वाटून दिलेली असायची. माझ्या वाट्याला कधी चहा, कधी भाकऱ्या, कधी भात, कधी भाजी, आमटी,,उसळ अशा जबाबदाऱ्या येत. त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करण्याची सवय लागली. ती आज प्रयत्न करूनही सुटत नाही. चार माणसांचा स्वयंपाक करायला घेतला आणि कितीही ठरवलं, तरी तो नकळतपणे सहा / आठ माणसांचा होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही मैत्रिणी गुपचूप कैऱ्या आणायचो. कधी छुंदा, तर कधी पन्हं करायचो आणि दुपार झाली, की खोलीत जाऊन गुपचूप खायचो. यातही वेगळीच मजा होती. या आंबट-गोड आठवणीनं मन भरून येतं. मी उत्तम स्वयंपाक करायचे; पण कधी कधी भारी गमती जमती व्हायच्या. माझा नवरा, मनीषसाठी मी खास भेंडीची भाजी बनवली होती. कारण सांगता येणार नाही; पण कोण जाणे चिंच अधिक पडली होती. आजही मनीष गमतीत म्हणतो, 'राजश्री, चिंचेची भेंडी घातलेली भाजी करशील का?' मनीषला चिकनापेक्षा मासे जास्त प्रिय आहेत. पापलेटचं कालवण, कोळंबी फ्राय, कुरकुरीत तळलेले बांगडे हे त्याचे लाडके पदार्थ आहेत. माझा मुलगा मल्हार खवय्या आहे. त्याला भारतीय, चायनीज, इटालियन, कॉन्टिनेन्टल असे वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. त्याच्यासाठी म्हणून मी खास यू-ट्यूबवर जाऊन या पदार्थांची रेसिपी पाहते. आता त्यात तरबेज झाले आहे. कॉन्टिनेन्टल पदार्थाला आपला इंडियन बेस देऊन एखादी फ्यूजन डिश करता येईल का, असेही मी पाहते. पदार्थ पौष्टिक व्हावा, असा माझा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ पास्ता करताना त्याच्यामध्ये चीज किंवा क्रीम कमी टाकून आपल्या भारतीय भाज्या जास्तीत जास्त टाकते आणि त्याचं पोषणमूल्य वाढवते. पिझ्झा करताना मैद्याचा बेस न वापरता नाचणीची भाकरी घेऊन त्याच्या वर भाज्या आणि पिझ्झासाठीचे पदार्थ टाकते. शूटिंगमधून ब्रेक मिळाला आणि घरी असले, की चटणी भरलेलं पापलेट करण्याची मल्हारची फर्माईश असते. मला एकेक पदार्थ निगुतीनं करायला आवडतात. आपल्या माणसांसाठी रांधण्यात वेगळीच मजा असते. स्वतः उत्तम स्वयंपाक करत असल्यामुळे बाहेर जाऊन स्पेशली खायची संधी फार कमी येते, तरीही काही काही ठिकाणं माझी हक्काची आणि लाडकी आहेत. बोरिवली स्टेशनबाहेरचा मंगेश वडापाव, गिरगाव कट्ट्यावरची मिसळ, वालाची खिचडी, दादरच्या आस्वादमधली कुरकुरीत आळू वडी तसंच झुणका-भाकर लोण्याचा गोळा, नमस्कारमधील फिश थाळी माझी फेवरेट आहे. माझी मैत्रिण सोनाली पंडित हिच्या हाताचं मटण खाल्ल्यानंतर जन्माला आल्याच सार्थक होतं. पुण्याला आले की चितळेंकडे बाकरवड्या आणि साखर लावलेले पाकातले गुलाबजाम घेतल्याशिवाय पुण्याच्या बाहेर पाय पडत नाही. बालगंधर्वाच्या प्रयोगांनंतर जोशी काकांकडील सात्विक जेवण मिस करू नये. गोड वरण-भात, बटाट्याची भाजी, उसळी, चटण्या, कोशिंबीर सारंच चवीचं. उपवास असला, की आप्पांकडल्या खिचडीची हटकून आठवण येते आणि त्याबरोबर दाण्याचं कूट पेरलेल्या काकडीच्या कोशिंबिरीची. लुसलुशीत खिचडी आणि खमंग काकडी, हे अफलातून समीकरण मला नेहमीच आवडतं.

चटणी भरलेले पापलेट

साहित्य : दोन मध्यम आकाराची ताजी पापलेट, मूठभर किसलेला ओला नारळ, मूठभर कोथिंबीर, चार हिरव्या मिरच्या, चार-पाच लसूण पाकळ्या, चार काळीमिरी, चमचाभर जिरे, एक लिंबू, चमचाभर हळद व लाल तिखट, चार कोकम, मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : प्रथम पापलेट कापून स्वच्छ करून त्याला हळद, मीठ, कोकम, लाल तिखट लावून वीस मिनिटं ठेवून द्यावं. ओलं खोबरे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, लिंबाचा रस, काळीमिरी, हिरव्या मिरच्या एकत्र करून, त्याचं बारीक वाटण वाटून घ्यावं. मॅरीनेट केलेल्या पापलेटामध्ये हा मसाला भरून दोरीनं अलगद बांधावं. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल घेऊन दोन्ही बाजूनं सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करावं.

शब्दांकन : निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढणे एक कला

$
0
0

पुणे टाइम्स टीम

'अगं राणी, वाढणाऱ्याच्या उजव्या हाताला मीठ, चटणी, कोशिंबीर वाढायचं असतं. लग्नाला तीन वर्षं झाली तरी पान काही वाढता येत नाही अजून,'

हा संवाद आपल्याही सवयीचा. सुगरण असणाऱ्या अनेकींची ताट वाढताना गडबड होते. मग भाजीचा रस्सा चटणीत आणि वरणामध्ये भिजलेले पापड, या गोष्टी अगदी ठरलेल्या. याच गोष्टी टाळण्यासाठी या खास टिप्स...

१. जेवण वाढताना नक्की काय करायचं आणि काय टाळायचं?

जेवायला बसल्यावर सगळ्यांत आधी लक्ष वाढलेल्या ताटाकडे जातं. स्वयंपाक ही एक कला आहे, असं म्हणतात; पण पोट आणि मन दोन्ही भरण्यासाठी ते पुरेसं नक्कीच नाही. ताट वाढण्याची पद्धत आणि सुटसुटीत टेबल यामुळे तुमचं जेवण अधिक रुचकर होऊ शकतं. पाहुण्यांच्या ते कायम लक्षात राहू शकते. पदार्थ कितीही उत्तम चवीचे असले, तरी ताटात गर्दी झालेली असली आणि पदार्थ एकमेकांत मिसळले असतील, तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. घरी जेवत असा किंवा हॉटेलमध्ये, वाढण्याची पद्धत ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यामुळे पाहुण्यांना आणि खरंतर तुमच्या कुटुंबीयांनासुद्धा वाढताना काही गोष्टी कायमच लक्षात ठेवायला हव्यात.

२. हे विसरून चालणार नाही.

पाणी हा अगदी न टाळण्यासारखा भाग आहे; त्यामुळे सगळ्यांत आधी ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना जेवण्याआधी एक घोटभर पाणी पिण्याची सवय असते. पाण्यालाही चव आणण्यासाठी त्यात जरासं लिंबू आणि पुदिना टाकता येईल. त्यामुळे पाण्याला वेगळी चव मिळेल आणि जेवण पचण्यासाठीही मदत होईल.

३. अतिथी देवो भव!

अतिथीचं स्वागत करणं, त्यांना सन्मान देणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य समजलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम जेवण वाढून संतुष्ट करणं, ही महत्त्वाची गोष्ट ठरते. आलेल्या पाहुण्यांना आरामशीर आणि पोटभर जेवता आलं, की ते एकंदरच खूष होतात. जेवणाच्या चवीबरोबरच तुम्ही केलेलं आतिथ्यही ते विसरणार नाहीत.

४. लक्ष वेधणारी कटलरी

जे पदार्थ करत आहात, त्याला योग्य आणि आवश्यक अशी कटलरीची मांडणी हवी. कटलरीला जुनी परंपरा लाभली आहे. ती एक संस्कृतीच बनून गेली आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

५. पदार्थांची योग्य मांडणी

तुम्ही तयार केलेले रुचकर पदार्थ योग्य रीतीनं वाढलेत, तर त्याची चव आणखी वाढते. प्रत्येक पदार्थाची वेगळी मांडणी, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. सूप बाउल्सपासून गोडाच्या वाट्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळ्या समोर आल्यास पाहुण्यांसाठी तो नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

६. पसारा नको

जास्तीची ताटं किंवा वाट्यांचा पसारा झाल्यास एखाद्याचा जेवणाचा मूड जाऊ शकतो. त्यामुळे जितके लोक जेवणार आहेत, त्यांना आवश्यक तितक्याच गोष्टी मांडून ठेवा.

७. पदार्थांनुसार क्रोकरीची निवड

चुकीचे पदार्थ चुकीच्या ताटांमध्ये किंवा वाट्यांमध्ये वाढले, तर कसं वाटेल? नूडल्स खाताना साधा चमचा आणि आइस्क्रीम खाताना काटा-चमचा, असं असल्यास कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे जे पदार्थ करणार आहात, त्यानुसार क्रोकरीची मांडणी हवी. केलेले पदार्थ खाण्यासाठी योग्य अशा गोष्टी असल्या, तर जेवणाचा आनंद वाढतो.

८. बच्चेकंपनी खूष होईल

तुम्ही वाढदिवस किंवा लहान मुलांच्या कार्यक्रमांसाठी पार्टीचं आयोजन करत असाल, तर नक्कीच त्यांना खूष करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना आवडणारे गडद आणि गोंडस, आकर्षक असे रंग क्रोकरीसाठी निवडा. याचसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या रंगांचा, कार्टून्सचा उपयोग या मांडणीमध्ये करता येईल. एकदा मन खूष झालं, की पोट भरायला वेळ लागत नाही.

९. पदार्थांची सजावट विसरू नका

प्रत्येक पदार्थ हा कसा लागतो, याचसोबत तो कसा दिसतो, हेदेखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक पदार्थाची सजावट विशिष्ट पद्धतीनं करता येते. डोळ्यांना सुंदर दिसणारे पदार्थ चवीबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. त्यामुळे कोणतेही पदार्थ बनवताना त्यांना चविष्ट आणि देखणं बनवायचं आहे, हे लक्षात घ्या.

१०. टिशू आणि नॅपकिन तितकेच गरजेचे

पदार्थांची चव, सजावट याचसोबत जेवणाचा एकंदर अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. केवळ रुचकर पदार्थ पानात वाढून चालत नाही, तर टेबलाची साधीच; पण साजेशी सजावट देखील गरजेची असते. याबरोबर योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात टिशू पेपर्स आणि नॅपकिन्स ठेवल्यास गडबडीच्या वेळाही टाळता येऊ शकतात.

संकलन : अनुजा मुळे, कॉलेज क्लब रिपोर्टर, आय.एल.एस.लॉ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनारसे संपले

$
0
0

ही गोष्ट १९७०ची आहे. त्यावेळी मी सहकारनगरमधील एका बंगल्यातील एक खोली आणि व्हरांडा असलेल्या जागेत राहत होतो. पुष्कळ मित्रमंडळी आमच्या घरी येत असत. त्यांची आम्हाला कधीच अडचण झाली नाही. त्या वर्षी दिवाळीसाठी पत्नीनं फराळ केला होता. मला आवडतात म्हणून स्टीलचा मोठा डबा भरून अनारसे केले होते. रात्री दहा वाजता जवळच राहणारे माझे मित्र बारटक्के आणि त्यांच्या पत्नी आले. आमचं स्वयंपाकघर, झोपण्याची खोली, बैठकीची खोली सगळं एकच होतं. आम्ही गप्पा मारत बसलो. माझ्या हाताजवळच अनारशाचा डबा होता. मी त्यातील एक अनारसा काढून बारटक्केंच्या पुढे धरला. त्यांना अनारसा आवडत नव्हता. मग वहिनींना विचारलं, तर त्या जेऊन आल्या असल्यामुळे नको म्हणाल्या. शेवटी मीच तो अनारसा खाऊन टाकला. तो संपल्यावर दुसरा अनारसा काढला. एकीकडे आमच्या गप्पा रंगत होत्या आणि दुसरीकडे तो डबा रिकामा होत होता. रात्री १ वाजता ते दोघं आपल्या घरी जाण्यासाठी उठले. त्यापूर्वी सगळा डबा रिकामा झाला होता. त्यावर्षीची दिवाळी अनारशाशिवायच गेली.

शरद बापट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइकचे स्वप्न पूर्ण झाले

$
0
0

मी बाइक घेण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते पूर्णही केले. गोष्ट बाइक किंवा मोपेड चालविण्याची नाही, तर स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याची आहे. आता बाइक चालविताना एक मात्र सांगावेसे वाटते, की बाइक चालविणारी मुलगी ही अचंब्याची गोष्ट नाही.

मृणाल ढोले

स्वत:ची बाइक असावी, हे माझे खूप जुने स्वप्न होते. ती शिकण्यासाठीची धडपड लहानपणापासून सुरू होती. घरी गिअरची बाइक नसल्यामुळे गावी गेल्यावर किंवा पाहुण्यांकडे गेल्यावर त्यांच्या बाइकवर एक तरी राइड मारण्याचा हट्ट नेहमी असायचा. सुरुवात तेथूनच झाली.

माझ्या आयुष्यातील आताच्या दोन महत्त्वाच्या गोष्टींची पायाभरणी ज्यांच्याकडे झाली, त्या माझ्या रत्नागिरीतील गोवेकर बंधू यांचे नाव मी येथे विशेषत: नमूद करेन. एका गुरूने गिटार शिकवली, तर दुसऱ्या बंधूने बाइक. तेव्हा मुक्तपणाची वेगळीच जाणीव झाली. तेथून स्वत:ची बाइक घेण्याची ऊर्मी वाढतच गेली. पुढे इंजिनीअरिंगसाठी पुण्यात आले. अगदी पहिल्या वर्षापासूनच सोबत राहणाऱ्या आजीबरोबर माझे बाइकचे स्वप्न मोठ्या प्रेमाने जोपासले. अगदी उद्याच गाडी येणार आहे, अशा उत्साहात तयारी सुरू केली. त्यात बाइक झेपेल एवढे वजन वाढवणेही आले. पेट्रोलसाठी घरच्यांवर अवलंबून राहायला नको, म्हणून घरात गिटार क्लास सुरू केले. बाइक घेण्यासाठी घरच्यांना राजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा नकार असल्यामुळे आजीला सोबत घेऊन पैसे साठवायलाही सुरुवात केली.

सरतेशेवटी बाइक घरी आणण्याची वेळ आली. (त्यासाठी तिसरे वर्ष उजाडले.) माझी आजी सुलभा शिंदेंमुळे रोख पैसे देऊन गाडी घेता आली. या बाइक घेण्याच्या आदल्या दिवशी आधी जाऊन चांगले हेल्मेट विकत घेतले. शेवटी २१ जुलै २०१६ या दिवशी बाइक आणली आणि केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. इतकी वर्षे जोपासलेले स्वप्न पूर्ण झाले.

अडचणी आल्या, तशा गेल्या. एखादे स्वप्न बघणे सोपे असते. त्याचा नाद सोडणे थोडे कठीण; पण त्या स्वप्नावर टिकून राहणे, ते बाळगणे, ते जोपासणे हे सगळ्यांत कठीण असते. मग ते कितीही मोठे असो वा लहान. मी फक्त स्वप्नावर टिकून राहिले, गोष्टी होत गेल्या. आता दोन वर्षे होत आली. मी रोज माझी बाइक वापरते आहे. रस्त्याने येता-जाता कौतुकाने नजरा वळतात. काही कुत्स‌ित हास्यही करतात. त्याचा मी स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. जगात जेवढे कौतुक आहे, तेवढी नकारात्मकता आहेच, हे अजून एकदा जाणवले. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कितीही मेहनत घ्या, झटा, शेवटी ती मिळवालही; पण त्यानंतरही आपल्या उत्साहावर पाणी ओतणारे भेटतातच. त्यांना त्या कामात यशस्वी न होऊ देणे, आपले स्वप्न मानाने घेऊन फिरणे, यातच आपले यश आहे.

बाइकमुळे कौतुक झाले (जसे सर्व नवीन गोष्टींचे होते तसे), ओळखी वाढल्या. एकदा सिग्नलवर थांबलेले असताना बाजूच्या काकांनी बाइकची चौकशी केली. मागे बसलेल्या आपल्या मुलीला विचारले, 'तुलाही घ्यायची का अशी बाइक?' काहींनी 'स्कूटी सोडून एवढी मोठी बाइक कशाला घेतली,' अशी वाक्येही तोंडावर फेकली. बाइकच का घ्यावीशी वाटली, असे हे वाचतानाही अनेकांना वाटले असेल. एखादी मोपेडसुद्धा घेता आली असती. मला एवढेच वाटते, मुलांनी भली मोठी बाइक घेतल्यास त्यांना कोणी 'कारणे दाखवा' नोटीस देत नाही. मुलांसाठीच तर असते बाइक, असे बहुतेकांना वाटते.

माझे उत्तर सोपे आहे. आपल्याकडची अर्धी लोकसंख्या ज्या प्रकारची गाडी वापरते, तीच मीही वापरते आहे. त्यात काही विशेष नाही. जेव्हा मुलींना बाइकवर बघणे ही अचंब्याची गोष्ट राहणार नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने बाइक हा विषय मुलामुलींसाठी सर्वसामान्य झाला, असे म्हणता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सँडविच

$
0
0

जगात काही पदार्थ असे आहेत, की ते काहीतरी घटना घडल्यामुळे तयार होतात किंवा मुद्दाम तयार केले जातात. अशी बरीच उदाहरणे देता येतील. अशा प्रकारात मोडणारा, सर्वांचा आवडता आणि सोपा प्रकार आहे सँडविच. आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत.

विष्णू मनोहर

सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर दोन पावांमध्ये भरलेले काही जिन्नस येतात. कालांतराने आपण सँडविच या शब्दाला आपापल्या परीने अर्थ देऊ लागलो. अगदी वाहतुकीमध्ये अडकलेल्या गाडीलाही तिचे सँडविच झाले, असे म्हणू लागलो. दोन व्यक्तींमधील वाद सोडविण्यासाठी गेलेलाही म्हणून जातो, 'तुमच्या भांडणात माझे सँडविच झाले आहे.' हे सारे असले, तरी सँडविच हे इंग्लंडमधील एका शहराचे नाव आहे. या शहराशी संबंधित दोन गोष्टींमुळेच सँडविच तयार झाले, असे सांगतात.

पहिली घटना अशी, सँडविच या शहरात पत्ते खेळणारा एक मनुष्य होता. पत्ते खेळता खेळता त्याला खायला आवडायचे; पण पत्त्याचा शौक एवढा होता, की त्याला बसून जेवायला वेळ पुरत नसे. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. या माणसाला एका हाताने खाता येईल आणि हात खराब होणार नाहीत, अशा पदार्थाची गरज होती. त्याने ब्रेडवर चिरलेल्या भाज्या ठेवल्या, त्याला चव यावी म्हणून वरून टोमॅटो सॉस घातला. हे सर्व जिन्नस खाली पडू नयेत म्हणून त्यावर ब्रेडचा दुसरा तुकडा ठेवला. यानंतर त्याचे पत्ते खेळणे आणि जेवणे एकत्रच होऊ लागले. या पदार्थाला काय नाव द्यावे, असा प्रश्न पडला, तेव्हा त्याने सरळ आपल्या शहराचे नाव देऊन टाकले.

अशीच दुसरी एक दंतकथा वाचनात आली होती. सँडविच या शहरातील एक मनुष्य जवळच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून थकला. त्याला भूक लागली होती. धावत बाजारात गेला; पण सगळी रेस्टॉरंट बंद झाली होती. एक रेस्टॉरंट बंद होताना त्याला दिसले. त्याने त्या मालकाला विनंती केली, की काहीतरी खायला द्यावे. काहीच शिल्लक नसल्याचे मालकाने सांगितले. शेवटी, 'पावाचा तुकडा तरी असेल तर द्या,' असे तो माणूस कळवळून म्हटला. फक्त पावाचा तुकडा कसा देणार, असे वाटून रेस्टॉरंट मालकाने मांसाचे भाजलेले दोन-तीन तुकडे टाकून पाव दिला. त्या व्यक्तीने तो पाव तसा खाल्ला. त्याला त्याची चव आवडली. दुसऱ्या दिवशी त्याचे त्याच शहरात काम होते. काम झाल्यानंतर तो त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. 'कालच्यासारखाच पदार्थ बनवून द्या,' असे त्याने मालकाला सांगितले. मालकालाही कौतुक वाटले. त्याने आनंदाने पावामध्ये मांसाचा तुकडा भरला, त्याला चव यावी म्हणून कच्चे टोमॅटो, कांदा, काही चटण्या आणि सॅडल भरून त्याला दिले. त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा तो पदार्थ अधिक चविष्ट लागला. बिल देताना मालकाने त्याला तो कोठून आला, असे विचारले. त्याने सँडविच या शहराचे नाव सांगितले. पुन्हा दोन-तीन दिवसांनी तो मनुष्य त्या शहरात आला असता त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याने तोच पदार्थ मागितला. मालकाने हसत हसत तो बनवून दिला आणि देताना सांगितले, 'तुम्ही गेल्यानंतर हा पदार्थ आम्ही बऱ्याच लोकांना दिला. त्यांना तो आवडला. आम्ही कौतुकाने तुमच्या शहराचे नाव त्याला दिले.' अशा प्रकारे सँडविचचा जन्म झाला.

कालांतराने लोकांनी सँडविचवर वेगवेगळे प्रयोग केले. त्यात लोणी आणि चीज आले. वेगवेगळ्या भाज्या, मांस अशा प्रकारचे जिन्नस टाकून त्याची चव वाढविण्यात आली. काही लोकांनी हे सर्व जिन्नस ब्रेडमध्ये घालून भाजले आणि 'ग्रील सँडविच' नावाचा वेगळा आविष्कार पुढे आला. नंतर त्याला समांतर अशा बऱ्याच पदार्थांची निर्मिती होऊ लागली. १७६०च्या दरम्यान बर्गरची निर्मिती झाली, असे म्हणतात. पुढे १९५५ सालानंतर मॅकडोनाल्डच्या प्रयत्नांनी ते लोकप्रिय झाले. साधारण १० वर्षांनंतर म्हणजे १९६५मध्ये 'सब वे सँडविच' नावाचा प्रकार सुरू झाला. त्यामध्ये लांबट अशा पावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, आपल्या आवडीचे सॉसेज, भाज्या, मांस घालून सँडविच आले. आता तर जगभरात नाश्ता किंवा जेवणाला सँडविच मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. काठीरोल हा यातीलच एक प्रकार म्हणता येईल. मी म्हणेन, की लोणचे आणि पोळीचा रोल हादेखील सँडविचचा एक प्रकार आहे. याबरोबर सँडविच ढोकळा, सँडविच मिठाई अशा पदार्थांची नावेही घेता येतील.

इंडियन कॉटेज सँडविचचा शोध मी लावला. भाकरी मधून कापून आतमध्ये हिरवी चटणी आणि लोणी लावायचे. मधे कांद्याच्या चकत्या आणि झुणका भरून खायला द्यायचे, म्हणजे हे सँडविच. तर अशी ही सँडविचची गोष्ट. पुढे कशी वाढत याईल, हे मी आत्ता सांगू शकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समजूतदार ‘घरा’मुळेच सर्व काही...

$
0
0

कलाकार असलेला नवरा बाकी कशाहीपेक्षा रियाजाविषयीची चौकशी आधी करतो. सासूबाईंचा आपलेपणा आणि ऐनवेळी जबाबदारी घेण्याची तयारी, तसेच स्वयंपाकासाठी येणाऱ्या अनिता मावशींमुळेही मी घराबाहेर असताना निवांत राहू शकते. अख्खे घरच समजूतदार असल्यामुळे मी कलाकार म्हणून कायम सकारात्मक राहिले आहे.

- शर्वरी जमेनीस, कथक नृत्य कलाकार- अभिनेत्री

निखिल (फाटक) आणि मी लग्न करायचे ठरवले, तेव्हा दोन्हीही घरी बोललो. दोघांच्याही घरून अर्थातच करिअरसाठी पूर्ण पाठिंबा होता; कारण त्या वेळी मी (म्हणजे आमची बॅच) पंडिता रोहिणीताई (भाटे) जितका वेळ मागतील, तितका वेळ मी रियाजासाठी त्यांना द्यायचे. तेव्हा त्यांची स्थिती अशी होती, की वयानुसार त्यांना काही करता यायचे नाही; पण सुचायचे भरपूर. आम्ही काही शिष्या तर जवळपास सकाळ- संध्याकाळ त्यांच्याबरोबरच असायचो. त्यांना अक्षरश: त्यांची कलाकृती कधी एकदा त्या आमच्यावर उतरवताहेत आणि आम्ही ती त्यांना करून दाखवत आहोत, असेच झालेले असायचे. त्यांचे शरीर साथ देत नसले, तरी रोहिणीताईंना पुष्कळ काही सुचत असल्यामुळे आम्ही तासन् तास त्यांच्याकडेच असायचो. माझ्या तालमीबाबतच्या या गोष्टी सासरीही समजून घेतल्या गेल्या.

आम्ही दोघंही परफॉर्मिंग आर्टिस्ट (तबला वादक आणि कथक नृत्य कलाकार) असल्यामुळे आमचे सादरीकरणांसाठीचे दौरे, कार्यक्रमासाठी उशीरा बाहेर थांबावे लागणे यांसारख्या गोष्टी होतात. हे सासूबाईंना माहिती असूनही, त्यांनी कधीही लग्नानंतर अटकाव केला नाही. कला आणि त्यासाठीचा रियाज समजून घेणे घरातच असल्यामुळे मलाही कधी घराबाहेर असताना अडचण आली नाही. माझ्या रोजच्या रियाजातही बॉडी 'ट्यून' ठेवावी लागते. शरीर हेच नृत्य कलाकाराचे माध्यम असल्यामुळे आवाज, स्टॅमिना, लय- तालाची समज वाढवण्यासाठी, अधिक धारदार करण्यासाठी सततचा रियाज आवश्यक असतो. हा 'क्लासिकल'चा रियाज घरी समजून घेतला गेला. निखिलच्या आई- बाबांना मी भेटायला गेले, तेव्हा त्यांनी 'देवाचे करायला मला आवडते. सणही आम्ही साजरे करतो,' असे सांगितले; पण तूही हे करायलाच हवे, असा आग्रह नाही धरला. माझ्या सुनेला फक्त मी करते, त्याविषयी आदर असावा, इतकीच माझ्या सासूबाईंची माफक अपेक्षा आहे. ती त्यांनी सुरुवातीलाच सांगितली. त्यात काहीच गैर नव्हते. त्यामुळे माझ्या कार्यक्रम किंवा दौऱ्यादरम्यान हे कधी मधे आले नाही, ते करायलाच हवे, अशी जबरदस्ती झाली नाही. मला त्यांच्या श्रद्धांविषयी पूर्ण आदर आहे.

हे सगळे सांगण्याचे कारण एवढेच, की 'फेस्टिव्हल'चा सीझन असतो. तो नृत्य कलाकारांसाठीही चुकलेला नाही. पुणे फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरण आणि इतरही काही कार्यक्रम हे बहुतेक वेळा गणेशोत्सव, नवरात्र या दरम्यानच असतात. मी कार्यक्रमाच्या रियाजासाठी, रंगीत तालमीसाठी आणि प्रत्यक्ष सादरीकरणासाठी जेवढा वेळ देणे आवश्यक आहे, तेवढा देतेच. तो देणे आवश्यक असल्याचे सासरीही समजून घेतले जाते आणि मीसुद्धा जाणीवपूर्वक सण वगैरे घरी साजरे करणे टाळत नाही. जेथे जाणे शक्य आहे, तेथे नक्कीच जाते. हे दोन्हीकडून व्यवस्थित सांभाळले गेल्यामुळेच मी नृत्य कलेसाठी वेळ देऊ शकले आहे.

शार्विलचा जन्म नंतरचा; पण २०११ मध्येच २०१३ मधील दौऱ्यासाठी मला विचारणा झाली होती. तेव्हा मी गरोदर नव्हते आणि आमचा 'चान्स' घ्यायचाही विचार नव्हता. नंतर मात्र मला 'गुडन्यूज' कळल्यानंतर शार्विल चार महिन्यांचा असतानाच आपल्याला दौऱ्यावर जावे लागणार असल्याचे गणित मी मांडले आणि आधी माझ्या 'गायनॅक'कडे धावले. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा हे शहर वसवणारा लँडस्केप आर्किटेक्ट वॉल्टर ग्रिफीन याला समर्पित केलेला 'कॅनबेरा म्युझिक फेस्टिव्हल' होता. त्या दौऱ्याला आधीच 'हो' म्हटल्यामुळे मला तेथे जाणे भाग होते. शार्विल चार महिन्यांचा असूनही मी ऑस्ट्रेलियाला गेले, ते माझ्या गायनॅक आणि आईच्या पाठिंब्यामुळेच; कारण नैसर्गिक प्रसूतीसाठी जाऊनही ऐनवेळी 'सीझेरियन' करावे लागले. एक महिना नीट सांभाळल्यानंतर मी हळूहळू नृत्याचा रियाज सुरूच केला. मी प्रसूतीनंतर दोन महिने आईकडे राहिले. तिसऱ्या महिन्यात मात्र मी शार्विलला घेऊन घरी आले आणि मग आम्ही तिघेच (निखिल, शार्विल आणि मी) होतो. अभिनयाचे अंग मी अक्षरश: त्याला 'फीडिंग' करताना आठवायचे. मग शार्विलला खेळवल्यासारखे करत मी पदन्यास करायचे. त्यामुळे शक्य तेवढ्या पूर्ण तालमीनिशी मी ऑस्ट्रेलियाला गेले आणि चार महिन्यांचा असताना मी जाऊन परफॉर्म करून आले. या दरम्यान मी 'स्काइप', व्हिडिओ कॉल्सवरून उत्तम संवाद साधला. त्या काही दिवसांतही मी घराशी नीट संपर्क ठेवून होते.

मला माझ्यात आणि निखिलमध्ये एक छान गोष्ट वाटते, की कलाकार असल्यामुळे आमची सर्जनशीलताच आम्हाला सतत कार्यरत राहायला शिकवते. ती सकारात्मकताही शिकवते. बायको परफॉर्म करून आली आहे, तर मी त्याला जेवण वाढावे, असे निखिलचे काहीही आग्रह नसतात. दोघांच्याही व्यग्र वेळापत्रकात कोणीही खाण्या-पिण्याचे नखरे करत नाही. काही वेळा तर त्याला चक्क साधा वरण- भातसुद्धा चालतो. त्यामुळे घराबाहेर असताना कधीही आमच्यात जेवण- झोप यांसारख्या गोष्टींवरून कुरबुरी होत नाहीत. उलट तो बाकी कशाहीपेक्षा रियाजाची चौकशी आवर्जून करतो. यात आणखीही मोठा वाटा आहे, तो आमच्याकडे स्वयंपाक करायला येणाऱ्या अनिता मावशींचा. त्या घराचा जवळपास पूर्ण ताबाच घेतात. शार्विलशी तर अतिशय आपलेपणाने वागतात. इतक्या, की तो त्यांना आजीच म्हणतो. मी घर त्यांच्यावर सोडून राहू शकते.

अर्थात, मी मुलाच्या बाबतीत एक मात्र पाळले आहे, की स्वत:चा परफॉर्मन्स असल्याशिवाय मी केवळ दुसऱ्याची कलाकृती पाहायची (अगदी कितीही इच्छा असली, तरीही) टा‌‌ळते. त्यात सिनेमा, नाटक, हॉटेलिंग सगळेच आले. सादरीकरणानंतर काही वेळा जेवण असते. मी तेथूनही शक्यतो पटकन निघते आणि नंतर थांबत नाही. त्यामुळे शार्विलला नीट वेळ देता येतो. तो पूर्ण झोपी जाण्यापूर्वी मी त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. मुले आपल्या आयुष्यात हरवलेली निरागसता पुन्हा आणतात. ते जीवापाड प्रेम, निष्पाप वागणे का चुकवायचे? मी त्याला हवा तेव्हा पूर्ण वेळ देते; त्यामुळे सासू- सासऱ्यांना आणि आई-बाबांनाही त्यांचा मोकळा वेळ मिळतो.

अर्थात, एकदा एवढे सगळे सांभाळूनही असे झाले होते, की शार्विल आजारी असल्याचे मला माहितीच नव्हते. शनिवार वाड्यावर माझा कार्यक्रम होता. शार्विल आजारी होता. मी कार्यक्रमादरम्यान पुन्हा पुन्हा मेसेज करत होते; तरीही सासूबाईंनी 'तू जा, मी आहे आणि तो अगदी बरा आहे,' असेच सांगितले. मी सादरीकरणादरम्यान काळजी करू नये; म्हणून त्यांनी मला त्याला उलटी झाल्याचे सांगितलेच नाही; पण त्या तातडीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. त्याला काही तासांनी बरे वाटलं. तोपर्यंत मी घरीही आले होते आणि त्यानंतरच मला सासूबाईंनी त्याला उलटी वगैरे झाल्याचे सांगितले. त्या वेळी तर शार्विल फक्त अडीच वर्षांचा होता. मात्र, मी ताण घेऊन कुठलीही गोष्ट करू नये, याचसाठी केवळ सासूबाईंनी इतकी काळजी घेतली. एवढे समजूतदार घर असेल, तरच घराबाहेर राहणे आणि कलाकार म्हणून समृद्ध होण्यासाठी अधिकाधिक कार्यशील असणे शक्य होऊ शकते. मी त्या बाबतीत नशीबवान आहे.

(शब्दांकन : आसावरी चिपळूणकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैफल प्रतिसाद

$
0
0

'ही' बरोबरी कशासाठी?

- निखिल पवार

कीर्ती परचुरे यांचा 'बरोबरीत चूक काय?' हा लेख वाचला. लेख मुलींच्या भावना आणि विचारांचे अधिक खुलेपणाने विश्लेषण करत लिहिला आहे, त्याबद्दल लेखिकेचे आभार. 'एखादी गोष्ट चूक आहे म्हणून करू नये, हे समजवावे,' हे लेखिकेचे म्हणणे अतिशय योग्य आहे. त्या मुली आहेत म्हणून त्यांना रोखणे बरोबर नाही, हे त्यांचे वाक्य खूप आवडले. समाजात असे विचार रुजवणे गरजेचे आहे. या लेखातून काही गोष्टीसुद्धा अधोरेखित झाल्या आहेत. मुलांशी बरोबरी करायची म्हणून शिव्या देणे, दारू पिणे, उशिरा घरात येणे, तोकडे कपडे घालणे इत्यादी मुली करतात असे जे म्हटले आहे, त्यासाठी त्या बंड करतात, नियम आणि रूढी झुगारून देतात, हे निरीक्षण लेखिकेने अचूक पकडले आहे. यात बरोबरी कोणत्या गोष्टीमध्ये करावी, हे समजावणे तितकेच गरजेचे आहे. लेखात इतर काही व्यक्तींनी दिलेले संदर्भ पटावेत असे आहेत. लेख वाचून काही गोष्टी जाणवल्या, त्या म्हणजे मुले करतात म्हणून आम्ही करणार, हा अट्टहास असून त्याला 'बरोबरी करतो' असे म्हणणे चुकीचे आहे. कोणतेही पालक मुलाने मद्यपान करावे, म्हणून प्रोत्साहन देत नसतात. पालकांना मुलग्यांबाबत ही गोष्ट रुचत नसेल, तर मुलींबाबत कसे आवडेल? यात मुले ऐकत नाहीत, जुमानत नाहीत त्याला जर मुली पालकांनी 'मुलगा' असल्यामुळे दिलेली सूट समजत असतील तर ते चूक आहे. अशा कारणासाठी मुलीनी 'बंड' करणे हे हास्यास्पद आहे.

'मुक्तांगण' संस्थेच्या अहवालानुसार सध्या ३५-४० टक्के तरुण मुली सिगारेट-दारूच्या, अंमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत, कित्येक जणी नैराश्यात आहेत. हे खेदजनक आहे. चित्रपट संपतो, गाणी मागे पडतात; परंतु त्यामुळे झालेला परिणाम वर्षानुवर्षे चालतो. आधी फक्त पुरुषांना समजवावे-रोखावे लागत होते, आता समाजाचा आधार, कौटुंबिक व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री सुद्धा या मार्गावर यावी? मुलींनी का करू नये, यापेक्षा त्यांनी ते करावे का आणि तशी खरेच गरज आहे का, हा प्रश्न विचाराने जास्त सयुक्तिक ठरेल. अशा गोष्टी सांगणे, समजावणे म्हणजे रूढीवादी असल्याचा शिक्का बसणे आहे; परंतु हे खरे आहे.

तारतम्य ठेवावे

- यशवंत भागवत

'आजचा स्त्रीवाद' हा विभावरी देशपांडे यांचा २६ मेचा लेख अतिशय आवडला. विशेषतः एखादी गोष्ट पुरुष करतात, तर मी का नाही, या भावनेतून केल्यास स्त्री-पुरुष समानतेच्या मूळ कल्पनेलाच सुरुंग लावल्यासारखे होईल, हे चपखल वाक्य. स्त्री अतिशय चिवट, सहनशील असून पुरुषापेक्षा काकणभर श्रेष्ठही असू शकते. असे असले, तरी तिला कमी लेखले जाते. अमेरिकेतही स्त्रियांना समान कामाला समान वेतन दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. या वृत्तीत बदल व्हायला हवा. दुसरी गोष्ट, शहाणपणाचा मक्ता पुरुषांनाच दिलेला असतो, ही चुकीची विचारधारणा. स्त्री-पुरुष मतभेदाबाबत शात्रज्ञांनी सिद्ध केले आहे, की त्यांच्या मेंदूच्या रचनाच वेगळ्या असतात; म्हणून विचार करण्याची पद्धती वेगळी असते; म्हणून मतभिन्नता असते. खूपदा स्त्रीचे कौटुंबिक सल्ले शहाणपणाचे असू शकतात. स्त्रीने कुठल्याही क्षेत्रात पुरुषासारखी उंच भरारी मारावी; पण तारतम्य हरवू देऊ नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दि शेप ऑफ वॉटरखोल, गहिरं, गूढ...

$
0
0

स्वरयंत्र काढून टाकलेली झेल्टा आणि प्रयोगशाळेत असलेला जयलक्ष यांच्यामध्ये फुलणाऱ्या नात्याची ही कथा. दोघेही बोलत नाहीत; पण त्यांना परस्परांची भाषा समजते. त्याच्यासाठी ती मोठे धाडस करते. त्याच्यामध्ये गुंतत जाते आणि शेवटी वेळ येते विरहाची.

- प्रसाद नामजोशी

स्वरयंत्र काढून टाकल्याच्या खुणा तिच्या मानेवर अजूनही आहेत. त्या बघून एखाद्या माशाच्या मानेवर असणाऱ्या कल्ल्यांची आठवण होते. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून एकदा त्यावरून हात फिरवायची तिला सवय आहे. तशा तिला अनेक सवयी आहेत. रोज सकाळी अलार्मच्या आवाजाने उठायचे, टबमध्ये अंघोळीसाठी पाणी सोडायचे, कॅलेंडरचे पान फाडायचे, अंडी उकडायला ठेवायची आणि पाणी उकळण्याचा तो आवाज सुरू झाला, की टबमध्ये बसायचे. आत्ममग्न व्हायचे. पाण्याच्या अनेकरंगी नादांतून एलायझाचा दिवस सुरू होतो. तिच्या आयुष्यात शब्द नाहीत. नाद मात्र आहेत.

एलायझा एका शासकीय प्रयोगशाळेत सफाई कर्मचारी आहे. तेथे तिला समजून घेणारी, तिच्याशी संवाद साधू शकणारी झेल्टा आहे. अनुभवी, उत्साही झेल्टा एलायझाची जवळची मैत्रीण आहे. शेजारी राहणारा गिल्स हा चित्रकार. गिल्स एकटा आहे, त्याला फारसे काम नाही. तोही एलायझाला समजून घेऊ शकतो.

अर्थात, एलायझाला काय हवे आहे, हे तोवर कोणाला समजत नाही, जोवर तिच्या त्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी म्हणून चक्क एक मेल-मर्मेड किंवा जलयक्ष दाखल होतो. हा जलयक्ष एलायझाला आवडतो. तोही तिच्यासारखाच! जात्याच अबोल. एका काचेच्या पिंपात ठेवले आहे त्याला. तिला बोलता येत नाही, त्यालाही नाही; पण तरी कळते भाषा सहवेदनेची. सह-अनुभूतीची. सहानुभूती नव्हे.

त्या दोघांनाही न आवडणारी आणखी एक गोष्ट तेथे समान आहे, स्ट्रिकलँड. जलयक्षावर लक्ष ठेवायला आलेला हा अत्यंत उर्मट असा सरकारी अधिकारी आहे. आपल्या हातातल्या रॉडने त्या जलचर जिवाला सतत शॉक देऊन, त्याची अवहेलना करणे त्याला अतिशय आवडते. त्या भानगडीत त्याने त्याची दोन बोटेही गमावली आहेत आणि म्हणून जलयक्षाचा अधिकाधिक राग करणे सुरू आहे. आता त्याची नजर आहे एलायझावर. तिचा मूकपणा त्याला आकर्षित करू लागलेला आहे. माझ्याबरोबर राहशील, तर तोंडाने थोडा फार आवाज काढू शकशील, हे त्याने तिला सरळसरळ आव्हान दिलेले आहे. घरी गेल्यावर पत्नीसमवेत एकांतात तिची बडबड त्याला असह्य होते. 'गप्प बस, शांतता हवी आहे मला,' तो सांगतो. पत्नीबरोबर रत होतानाही त्याच्या कल्पनेत एलायझाच असणार.

एलायझाला याची कल्पना असण्याचे कारण नाही. तिला बिचारीला तर आपल्याला आवडू लागलेल्या जलयक्षावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात रस्सीखेच सुरू झालेली आहे, हेसुद्धा माहिती नाही. दिवस साठच्या दशकातले. शीतयुद्धाचे. रशियाने एका कुत्रीला अंतराळात पाठवून अमेरिकेवर आघाडी घेतलेली आहे. आता त्यांना या जलयक्षाला अंतराळात पाठवायचे आहे. त्याची माहिती पुरवणारा त्यांचा कॉम्रेड आहे त्या प्रयोगशाळेतला शास्त्रज्ञ डॉक्टर रॉबर्ट. म्हणजे एकीकडे रशिया, दुसरीकडे अमेरिका आणि मधे जलयक्षाच्या प्रेमात पडलेली, मूक एलायझा.

अचानक प्रयोगशाळेत काही हालचाली घडू लागतात. अमेरिकन सैन्याचे जनरल हॉइट तेथे येतात. या प्राण्याचे काय करायचे याची चर्चा सुरू होते. रशियाला तो मिळू द्यायचा नाही. वास्तविक तो जीव संगीताला प्रतिसाद देऊ शकतो, ही महत्त्वाची माहिती रॉबर्टनेच रशियाला एव्हाना पुरवली आहे; पण तो शास्त्रज्ञही आहेच. त्यामुळे त्या जिवाला पाण्यात टाकायला हवे, त्याला तुम्ही मारून टाकू शकत नाही, हे तो कळवळून जनरल हॉइटना सांगतो. त्यावर जनरल त्याला सांगतात, 'तुला काय म्हणायचे आहे ते मी ऐकून घेईन; पण मी काय करायचे ते तू मला नाही सांगायचेस बरे बाळा!' एलायझा हे सगळे चोरून ऐकते आहे.

तिला धक्का बसला आहे. रॉबर्ट काही करू शकत नाही. ती आता गिल्सला जलयक्षाला तेथून बाहेर काढण्याविषयी सांगू लागते. हे सांगताना ती अॅग्रेसिव्ह झालेली आहे. ती म्हणते तो जेव्हा माझ्याकडे बघतो, तेव्हा माझ्यात काहीतरी कमी आहे, असे त्याला वाटत नाही. आपल्याला आहे तसेच बघणारा तो एकच जीव अस्तित्वात आहे, याची तिला खात्री आहे.

आता जलयक्षाला वाचवायचा प्रयत्न दोन जण करत आहेत. एलायझा आणि डॉक्टर रॉबर्ट. रॉबर्ट पुन्हा आपल्या रशियन कॉम्रेडला भेटतो आणि 'त्या'ला वाचवायचा प्रयत्न करू, असे सांगतो. रशियाकडूनही 'त्या'ला मारून टाकायचा सल्ला दिला जातो. रॉबर्ट नकार देतो. मी देशभक्त आहे, तसा शास्त्रज्ञही आहे, मला शिकायचे आहे, हा त्याचा मुद्दा. त्यावर त्याला उत्तर मिळते, की आपल्याला काही शिकायची गरज नाही. अमेरिकेने नसत्या गोष्टी शिकायला नकोत, हे महत्त्वाचे. त्यांचा मुद्दा सरळ आहे.

शेवटी एलायझाचा मुद्दा गिल्सला पटतो आणि तो तिच्या प्लॅनमध्ये सहभागी होतो. शासकीय प्रयोगशाळेतून अभ्यासासाठी आणलेल्या अत्यंत सुरक्षित अशा जलयक्षाला पळवायची योजना. एलायझाच्या त्या योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रत्यक्ष पळवण्याच्या तिच्या प्रयत्नात अनेक गोष्टी आडव्या येतात; पण एलायझाच्या मागावर असलेल्या झेल्टाची, तो जीव वाचवायची आटोकाट इच्छा असलेल्या रॉबर्टची ऐनवेळी मदत होते आणि एलायझाच्या घरातल्या टबमध्ये जलयक्ष विराजमान होतो. पाऊस सुरू होऊन कालवा भरण्याचा दिवस ती कॅलेंडरवर नोंदवून ठेवते. त्या दिवशी त्याला कालव्यात सोडायचे, असे तिचे ठरलेले आहे.

दुसऱ्या दिवशी झेल्टा आणि एलायझा नेहमीप्रमाणे कामावर जातात. जलयक्ष गायब झाल्याप्रकरणी चौकशा सुरू आहेत. स्ट्रिकलँड दोघींना बोलावून घेतो. दोघीही हात वर करतात. एलायझाकडे मात्र आता डोळे वटारून बघण्याची हिंमत स्ट्रिकलँडला होत नाही. तुमच्याकडून काय माहिती मिळणार? लोकांची घाण साफ करणारे कर्मचारी तुम्ही, असा अकारण शेरा तो मारून त्यांना जायला सांगतो. झेल्टा सुटकेचा निश्वास टाकून बाहेर जाते. एलायझा मात्र स्ट्रिकलँडच्या डोळ्याला डोळा भिडवून खाणाखुणा करते. त्याला अर्थ कळत नाही. झेल्टाला कळला आहे; पण ती वेळ मारून नेते. स्ट्रिकलँडच्या तोंडावर त्याचा उद्धार करण्याचे धैर्य एलायझाला आलेले आहे. एकप्रकारे स्ट्रिकलँडनेच ते बहाल केले आहे. शत्रूच्या तेजाने स्वत:ला समृद्ध करत जाणाऱ्या एखाद्या परीकथेतल्या गोष्टीप्रमाणे एलायझामध्ये हे परिवर्तन झालेले आहे.

एलायझाच्या घरी जलयक्ष हळूहळू काही गोष्टी समजू लागलेला आहे. एलायझाच्या स्पर्शाचे अर्थ तो लावू लागलेला आहे. एकदा तोही तिला स्पर्श करतो, एलायझा शहारते; पण सावरतेही. काळ काही प्रहरांचा जावा लागतो; पण एका नव्या अनुभवाला ती सामोरी जाते. दुसऱ्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याचा अर्थ झेल्टाला लक्षात येऊ लागतो. सगळे कळल्यावर ती म्हणते, 'बाई, कुठल्या का असेना; पण शेवटी पुरुषावर विश्वास ठेऊ नये हेच खरे!'

एलायझाला आता प्रणयाचे नवे नवे खेळ सुचू लागलेले आहेत. आता ती त्याचा आणि आपला एकत्र विचार करू लागलेली आहे. दोघांना एक टब पुरणार नाही, म्हणून ती संपूर्ण बाथरूम पाण्याने भरते. पाणी बाहेर गळू लागते. आता ते कधी नव्हे ते चार प्रेक्षक लाभलेल्या खालच्या थिएटरमध्येसुद्धा टपकू लागलेले आहे. शेजारचा गिल्स पळत पळत तिच्या घरात जातो आणि अखंड धारा बाहेर पडत असलेल्या बाथरूमचे दार खेचतो. पाण्याचा प्रवाह मोकळा होतो आणि जलयक्षाच्या मिठीत असलेल्या अत्यंत समाधानी एलायझाला तो बघतो!

आता पाऊस सुरू झालेला आहे, कालवा भरत आला आहे. एलायझाचे मन जड झालेले आहे.

तिकडे स्ट्रिकलँड रॉबर्टवर नजर ठेवून आहे. त्यामुळे त्याला रशियन एजंट कडून गोळ्या घातल्या जातात. मरणासन्न रॉबर्टकडून स्ट्रिकलँड हवी ती माहिती घेतो आणि झेल्टापर्यंत पोचतो. तिचा नवरा घाबरून त्याला असलेली माहिती सांगून टाकतो आणि स्ट्रिकलँड एलायझाच्या घरी पोचतो. आता ती गिल्ससमवेत जलयाक्षाला कालव्यात सोडायला गेलेली आहे. भिंतीवरचं कॅलेंडर हे स्ट्रिकलँडला सांगत फडफडते आहे.

कालवा. विरहाचा प्रसंग. आपल्या दोघांना जाता येणार नाही, तुला एकट्याला जावे लागेल, असे एलायझा जलयक्षाला सांगत असतानाच स्ट्रिकलँड तेथे पोचतो आणि अमानुषपणे गोळ्या चालवतो; पण जलयक्ष उठून उभा राहतो. यक्षच तो, त्याच्या जखमा भरलेल्या आहेत. आता तो एलायझाला घेऊन कालव्यात उडी मारतो. पाण्यात खोल आत तो तिला जवळ घेतो. स्वरयंत्र काढून टाकलेल्या तिच्या मानेवरच्या खुणा आता पाण्यात श्वास घेण्याच्या झडपा होतात. एलायझाचे नवे आयुष्य सुरू होतं. 'दि शेप ऑफ वॉटर' हा चित्रपट अनेक नव्याजुन्या कथांचे संदर्भ एका वेगळ्या पद्धतीच्या सादरीकरणातून आपल्यापुढे मांडतो. एलायझाच्या भावनांना अधिक गहिरे करून एका गूढ पातळीवर खोलवर नेऊन ठेवतो.

दि शेप ऑफ वॉटर (इंग्रजी/ १२३ मिनिटे/ २०१७)

लेखक : गिलेर्मो गेल तोरो, वॅनिसा टेलर

दिग्दर्शक : गिलेर्मो गेल तोरो

कलाकार :

एलायझा- सॅली हॉकिन्स

झेल्टा- ऑक्टॅव्हिया स्पेन्सर

स्ट्रिकलँड- मायकेल शेनॉन

गिल्स- रिचर्ड जेन्किंस

(सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासह चार ऑस्कर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह एकूण तेरा नामांकने)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरासाठी मुलांचा जाच

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न १ : आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला दोन मुले आहेत. एक मोठा मुलगा व लहान मुलगी. आमच्या मुलाने ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. लहानशा कारणावरून बायकोला घेऊन घरातून निघून गेला. त्याने आम्हाला आतापर्यंत एका पैशाचीही मदत केली नाही. आमची मुलगी नोकरी करते व घर तिच्या पगारावर चालते. महिन्यापूर्वी रात्री मुलाने मला फोन करून येतो म्हणून सांगितले. त्यावेळी माझ्या एका डोळ्याचे ऑपरेशन दोन दिवसांपूर्वीच झाले होते. आल्यापासून हिस्सा हवा आहे, या एकाच गोष्टीवरून सतत भांडण करत आहे. मारहाणीची धमकी देऊन दोनदा पोलिसात खोटी तक्रार देऊन आम्हा तिघांना सतत मानसिक त्रास देत आहे. या काळात त्याने आम्हाला कसलीच म्हणजे एका पैशाचीही मदत केलेली नाही. या सर्व गोष्टींमुळे आमचे तिघांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. तेव्हा यावर उपाय सुचवावा.

प्रश्न २ : माझे आत्ताचे वय ८४ आहे. माझ्या मुलीने तिच्या भाड्याच्या घरात माझी सर्व प्रकारे व्यवस्था केली आहे. तेथे मी एकटी राहत आहे. १९९५ साली माझ्या मुलाचे लग्न झाल्यापासून मला व घरातल्या सर्वांना मुलगा व सून या दोघांकडून अपमानास्पद वागणूक मिळत गेली. २००२ला मला फ्रॅक्चर झाल्यावर मुंबईच्या हॉस्पिटलमधून या दोघांच्या अशा स्वभावामुळे स्वत:च्या घरी न येता थेट खेड्यातील जागेत जाऊन राहावे लागले. तेथे पाण्याच्या व सगळ्याच गैरसोयी होत्या. मी बेडवर. उतरत्या वयात बाबांनी माझी सेवा केली. २००७ला गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. तेव्हा खर्च जाऊ दे; पण साधी चौकशीही केली नाही. २०१४ मध्ये बाबा पडून त्यांना फ्रॅक्चर झाले. तेव्हा ऑपरेशनचा खर्च सुनेनेच केला. मुलींनी दिलेली मदत नाकारली. डिस्काउंट मिळत असून घेतले नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर बाबांना परत खेड्यातील घरी पाठवायच्याऐवजी मुद्दाम स्वत: सांभाळायला नेले. तेथे आमच्यावर वर्चस्व गाजवून आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न केला. आमच्या दोघांत भेद केला. आम्हाला प्रेमाने भेटायला येणाऱ्यांना हाकलून दिले. आमच्याविरुद्ध वाईट अफवा पसरवण्याचे काम केले. कटू शब्द, खोचक बोलणे, येता-जाता अपमान, तिरस्कार, आल्या-गेल्यांसमोर आमच्याबद्दल खोट्या तक्रारी, वर्चस्व गाजविणे, आम्हाला एकमेकांपासून वेगळे ठेवणे, आम्ही आयुष्यभर प्रेमाने जोडलेल्या माणसांना वाईट बोलून हाकलून लावणे, आमची नाती तोडणे आणि असे आमचे सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त करून आम्हाला एकाकी करण्यात आनंद मानला. दु:खाने बाबांनी अन्न सोडले. त्यांची तब्येत महिन्याभरातच ढासळली. यांच्या अशा वागण्यामुळे स्वत:च्याच घरात आम्हाला १५ वर्षे राहता आले नाही. माझी दुखणी वाढत चालली आहेत; पण मुलगा व सुनेकडून एका शब्दाची, पैशाचीही मदत नाही. आम्हीही या दोघांकडून घेतली नाही. आम्हाला सर्व प्रकारे सांभाळण्याचे काम माझ्या दोन मुली जबाबदारीने व प्रेमाने करत आहेत. मुलींना माझे घर द्यायची इच्छा आहे; पण मुलगा व सून यांनी ते बळकावले असून ते खाली करत नाहीत. घराचे शेअर सर्टिफिकेट त्यांनी अडवून ठेवले आहे.

बाबांनी नोंदणीकृत मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आमच्या घरावर माझा स्वत:चा कायदेशीर हक्क आहे. आजवर मुलगा व सून या दोघांनी त्या घराचा यथेच्छ उपभोग घेतला आहे. आता त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना या घरात राहण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. सुनेचे दुसरे घर आहे, तरीही ते बेकायदेशीरपणे माझ्या घरात राहतच आहे. या जगात माझे फक्त हे एक घर आहे. ते माझे मला मिळावे. माझ्या घराची जी काही कागदपत्रे त्यांच्याकडे असतील ती कायदेशीरपणे सोसायटीच्या सेक्रेटरीकडे देऊन टाकावीत. यासाठी काय करावे?

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या कौटुंबिक समस्यांचा एक मोठा भाग आहेत. दिवसेंदिवस चांगल्या वैद्यकीय सोयी व प्रगतीमुळे नागरिकांचे वाढते आयुर्मान आणि त्यामानाने कमी होत जाणारी संसाधने यातून या समस्या उग्र स्वरूप धारण करीत आहेत. वृद्धापकाळ हा नाईलाजाने, तब्येतीच्या कारणाने आर्थिक, शारीरिकदृष्ट्या परावलंबित्वाचा असतो. त्यामुळे कुटुंबातील लहान मुले आणि वृद्ध मंडळी यांची सारखीच काळजी घ्यावी लागते. रोजच्या धावपळीच्या जीवनात त्यासाठी पुरेसा वेळ वा पैसा उपलब्ध होत नसेल, तर प्रचंड तणाव निर्माण होतात.

वरीलपैकी दोन्ही उदाहरणांत राहते घर आई-वडिलांच्या नावावर असेल, तर पोटच्या मुलांविरुद्धही त्या घराचा ताबा मिळवण्यासाठी, त्या घराची कागदपत्रे मिळवण्यासाठी तसेच उपद्रवी मुलांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयात दावा करता येतो. समजा प्रकृतीच्या कारणास्तव स्वत:ला न्यायालयात हजर राहणे शक्य नसेल, तरी मुखत्यारपत्र देऊन खटला चालवता येतो.

मारहाणीच्या धमक्या, छळवणूक यासाठी पोलिसात तक्रार करणे हा अगदी प्राथमिक सल्ला झाला. स्वत: पोलिस स्टेशनला जाणे शक्य नसेल वा अगदीच आणीबाणीची वेळ असेल, तर तत्काळ पोलिस कंट्रोल रूमला फोन करून मदत मागवणे शक्य आहे. बऱ्याचदा आपलाच मुलगा आहे, त्याला घरात घेतले नाही, तर लोक काय म्हणतील, अशा दबावाला बळी न पडता मुलाला स्पष्टपणे घरी येऊ नकोस अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे सांगायला हरकत नाही. तुमच्या शेजाऱ्यांनाही गरजेनुसार मदत करण्याची विनंती करता येईल. मुलावर असलेल्या प्रेमामुळे कशी तक्रार करावी, घरातली भांडणे लोकांना कशी सांगायची, असा विचार करत राहिल्यास अन्यायाचा प्रतिकार करणे कठीण होऊ शकते. जोवर घरमालक/पालक स्वत: जीवित आहे तोवर मुलांना त्यांच्या मालमत्तेत कुठलाही हक्क नसतो. त्यामुळे जबरदस्तीने वा प्रेमापोटी कुठल्याही कागदपत्रांवर सही न करणे हे उत्तम. तुम्ही स्वत: आजारी पडून अंथरुणाला खिळून पडण्याच्या अगोदर मन:स्थिती व बुद्धी कार्यरत असताना तुमच्या इच्छेनुसार मृत्युपत्र करून नोंदणी करून ठेवणे, हे जास्त योग्य. हिंदू व्यक्तीवर आपली मालमत्ता मुलांनाच दिली पाहिजे, असे कुठलेही बंधन नाही. सज्ञान हिंदू आपली सर्व मालमत्ता आपल्या हवी तशी मृत्युपत्राद्वारे वाटू शकतो. हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने वैध ठरेल असे मृत्युपत्र करून, त्याची नोंदणी वेळेत करून घेणे हे उत्तम.

याशिवाय मुलाकडून पोटगीची अपेक्षा असेल, तर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ अंतर्गत पालकही आपल्या मुलांविरुद्ध पोटगीचा खटला दाखल करू शकतात. नोकरी न करणाऱ्या असहाय्य पालकांना पोटगी देणे, ही मुलांची जबाबदारी आहेच.

याव्यतिरिक्त न्यायालयात शक्यतो जायचे नसेल, तर तुमच्या घराजवळील पोलिस स्टेशनला अर्ज करून पोलिसांच्या महिला व बालसाहाय्य कक्षाद्वारे समुपदेशनातून काही सामंजस्यपूर्ण तडजोड होऊ शकत असल्यास पाहावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरासाठी मुलांचा जाच

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न १ : आम्ही दोघे ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला दोन मुले आहेत. एक मोठा मुलगा व लहान मुलगी. आमच्या मुलाने ९ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला. लहानशा कारणावरून बायकोला घेऊन घरातून निघून गेला. त्याने आम्हाला आतापर्यंत एका पैशाचीही मदत केली नाही. आमची मुलगी नोकरी करते व घर तिच्या पगारावर चालते. महिन्यापूर्वी रात्री मुलाने मला फोन करून येतो म्हणून सांगितले. त्यावेळी माझ्या एका डोळ्याचे ऑपरेशन दोन दिवसांपूर्वीच झाले होते. आल्यापासून हिस्सा हवा आहे, या एकाच गोष्टीवरून सतत भांडण करत आहे. मारहाणीची धमकी देऊन दोनदा पोलिसात खोटी तक्रार देऊन आम्हा तिघांना सतत मानसिक त्रास देत आहे. या काळात त्याने आम्हाला कसलीच म्हणजे एका पैशाचीही मदत केलेली नाही. या सर्व गोष्टींमुळे आमचे तिघांचे शारीरिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. तेव्हा यावर उपाय सुचवावा.

प्रश्न २ : माझे आत्ताचे वय ८४ आहे. माझ्या मुलीने तिच्या भाड्याच्या घरात माझी सर्व प्रकारे व्यवस्था केली आहे. तेथे मी एकटी राहत आहे. १९९५ साली माझ्या मुलाचे लग्न झाल्यापासून मला व घरातल्या सर्वांना मुलगा व सून या दोघांकडून अपमानास्पद वागणूक मिळत गेली. २००२ला मला फ्रॅक्चर झाल्यावर मुंबईच्या हॉस्पिटलमधून या दोघांच्या अशा स्वभावामुळे स्वत:च्या घरी न येता थेट खेड्यातील जागेत जाऊन राहावे लागले. तेथे पाण्याच्या व सगळ्याच गैरसोयी होत्या. मी बेडवर. उतरत्या वयात बाबांनी माझी सेवा केली. २००७ला गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. तेव्हा खर्च जाऊ दे; पण साधी चौकशीही केली नाही. २०१४ मध्ये बाबा पडून त्यांना फ्रॅक्चर झाले. तेव्हा ऑपरेशनचा खर्च सुनेनेच केला. मुलींनी दिलेली मदत नाकारली. डिस्काउंट मिळत असून घेतले नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर बाबांना परत खेड्यातील घरी पाठवायच्याऐवजी मुद्दाम स्वत: सांभाळायला नेले. तेथे आमच्यावर वर्चस्व गाजवून आम्हाला विभक्त करण्याचा प्रयत्न केला. आमच्या दोघांत भेद केला. आम्हाला प्रेमाने भेटायला येणाऱ्यांना हाकलून दिले. आमच्याविरुद्ध वाईट अफवा पसरवण्याचे काम केले. कटू शब्द, खोचक बोलणे, येता-जाता अपमान, तिरस्कार, आल्या-गेल्यांसमोर आमच्याबद्दल खोट्या तक्रारी, वर्चस्व गाजविणे, आम्हाला एकमेकांपासून वेगळे ठेवणे, आम्ही आयुष्यभर प्रेमाने जोडलेल्या माणसांना वाईट बोलून हाकलून लावणे, आमची नाती तोडणे आणि असे आमचे सामाजिक जीवन उद्‌ध्वस्त करून आम्हाला एकाकी करण्यात आनंद मानला. दु:खाने बाबांनी अन्न सोडले. त्यांची तब्येत महिन्याभरातच ढासळली. यांच्या अशा वागण्यामुळे स्वत:च्याच घरात आम्हाला १५ वर्षे राहता आले नाही. माझी दुखणी वाढत चालली आहेत; पण मुलगा व सुनेकडून एका शब्दाची, पैशाचीही मदत नाही. आम्हीही या दोघांकडून घेतली नाही. आम्हाला सर्व प्रकारे सांभाळण्याचे काम माझ्या दोन मुली जबाबदारीने व प्रेमाने करत आहेत. मुलींना माझे घर द्यायची इच्छा आहे; पण मुलगा व सून यांनी ते बळकावले असून ते खाली करत नाहीत. घराचे शेअर सर्टिफिकेट त्यांनी अडवून ठेवले आहे.

बाबांनी नोंदणीकृत मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आमच्या घरावर माझा स्वत:चा कायदेशीर हक्क आहे. आजवर मुलगा व सून या दोघांनी त्या घराचा यथेच्छ उपभोग घेतला आहे. आता त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांना या घरात राहण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. सुनेचे दुसरे घर आहे, तरीही ते बेकायदेशीरपणे माझ्या घरात राहतच आहे. या जगात माझे फक्त हे एक घर आहे. ते माझे मला मिळावे. माझ्या घराची जी काही कागदपत्रे त्यांच्याकडे असतील ती कायदेशीरपणे सोसायटीच्या सेक्रेटरीकडे देऊन टाकावीत. यासाठी काय करावे?

उत्तर : ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या कौटुंबिक समस्यांचा एक मोठा भाग आहेत. दिवसेंदिवस चांगल्या वैद्यकीय सोयी व प्रगतीमुळे नागरिकांचे वाढते आयुर्मान आणि त्यामानाने कमी होत जाणारी संसाधने यातून या समस्या उग्र स्वरूप धारण करीत आहेत. वृद्धापकाळ हा नाईलाजाने, तब्येतीच्या कारणाने आर्थिक, शारीरिकदृष्ट्या परावलंबित्वाचा असतो. त्यामुळे कुटुंबातील लहान मुले आणि वृद्ध मंडळी यांची सारखीच काळजी घ्यावी लागते. रोजच्या धावपळीच्या जीवनात त्यासाठी पुरेसा वेळ वा पैसा उपलब्ध होत नसेल, तर प्रचंड तणाव निर्माण होतात.

वरीलपैकी दोन्ही उदाहरणांत राहते घर आई-वडिलांच्या नावावर असेल, तर पोटच्या मुलांविरुद्धही त्या घराचा ताबा मिळवण्यासाठी, त्या घराची कागदपत्रे मिळवण्यासाठी तसेच उपद्रवी मुलांना घरात येण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयात दावा करता येतो. समजा प्रकृतीच्या कारणास्तव स्वत:ला न्यायालयात हजर राहणे शक्य नसेल, तरी मुखत्यारपत्र देऊन खटला चालवता येतो.

मारहाणीच्या धमक्या, छळवणूक यासाठी पोलिसात तक्रार करणे हा अगदी प्राथमिक सल्ला झाला. स्वत: पोलिस स्टेशनला जाणे शक्य नसेल वा अगदीच आणीबाणीची वेळ असेल, तर तत्काळ पोलिस कंट्रोल रूमला फोन करून मदत मागवणे शक्य आहे. बऱ्याचदा आपलाच मुलगा आहे, त्याला घरात घेतले नाही, तर लोक काय म्हणतील, अशा दबावाला बळी न पडता मुलाला स्पष्टपणे घरी येऊ नकोस अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे सांगायला हरकत नाही. तुमच्या शेजाऱ्यांनाही गरजेनुसार मदत करण्याची विनंती करता येईल. मुलावर असलेल्या प्रेमामुळे कशी तक्रार करावी, घरातली भांडणे लोकांना कशी सांगायची, असा विचार करत राहिल्यास अन्यायाचा प्रतिकार करणे कठीण होऊ शकते. जोवर घरमालक/पालक स्वत: जीवित आहे तोवर मुलांना त्यांच्या मालमत्तेत कुठलाही हक्क नसतो. त्यामुळे जबरदस्तीने वा प्रेमापोटी कुठल्याही कागदपत्रांवर सही न करणे हे उत्तम. तुम्ही स्वत: आजारी पडून अंथरुणाला खिळून पडण्याच्या अगोदर मन:स्थिती व बुद्धी कार्यरत असताना तुमच्या इच्छेनुसार मृत्युपत्र करून नोंदणी करून ठेवणे, हे जास्त योग्य. हिंदू व्यक्तीवर आपली मालमत्ता मुलांनाच दिली पाहिजे, असे कुठलेही बंधन नाही. सज्ञान हिंदू आपली सर्व मालमत्ता आपल्या हवी तशी मृत्युपत्राद्वारे वाटू शकतो. हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने वैध ठरेल असे मृत्युपत्र करून, त्याची नोंदणी वेळेत करून घेणे हे उत्तम.

याशिवाय मुलाकडून पोटगीची अपेक्षा असेल, तर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम १२५ अंतर्गत पालकही आपल्या मुलांविरुद्ध पोटगीचा खटला दाखल करू शकतात. नोकरी न करणाऱ्या असहाय्य पालकांना पोटगी देणे, ही मुलांची जबाबदारी आहेच.

याव्यतिरिक्त न्यायालयात शक्यतो जायचे नसेल, तर तुमच्या घराजवळील पोलिस स्टेशनला अर्ज करून पोलिसांच्या महिला व बालसाहाय्य कक्षाद्वारे समुपदेशनातून काही सामंजस्यपूर्ण तडजोड होऊ शकत असल्यास पाहावे.

----------

प्रश्न पाठवण्यासाठी…

या सदरासाठी प्रश्न पाठवताना, कृपया खालील गोष्टी लक्षात घेऊन प्रश्न पाठवावेत.

१. समस्या नेमक्या शब्दांत मांडावी.

२. घटना व माहिती शक्य तितकी अचूक व नेमकी द्यावी. आपण दिलेल्या माहितीवरूनच उत्तर देणे शक्य होईल.

३. कायद्यातील तरतुदी सारख्याच असल्या तरी प्रत्येक समस्येतील घटना, परिस्थितीनुसार उत्तर वेगळे असू शकते.

४. आपले नाव या सदरात प्रसिद्ध केले जाऊ नये, असे वाटत असेल तर तसा स्पष्ट उल्लेख करावा.

५. न्यायालयात खटला प्रलंबित असेल तर तसाही स्पष्ट उल्लेख करावा.

६. निवडक प्रश्नांची उत्तरे केवळ या सदरातून दिली जातील. त्यासाठी कोणताही स्वतंत्र अथवा वैयक्तिक संपर्क केला जाणार नाही.

आपले प्रश्न या ईमेल पत्त्यावर पाठवा matalegal7@gmail.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सँडविच

$
0
0

जगात काही पदार्थ असे आहेत, की ते काहीतरी घटना घडल्यामुळे तयार होतात किंवा मुद्दाम तयार केले जातात. अशी बरीच उदाहरणे देता येतील. अशा प्रकारात मोडणारा, सर्वांचा आवडता आणि सोपा प्रकार आहे सँडविच. आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत.

विष्णू मनोहर

सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर दोन पावांमध्ये भरलेले काही जिन्नस येतात. कालांतराने आपण सँडविच या शब्दाला आपापल्या परीने अर्थ देऊ लागलो. अगदी वाहतुकीमध्ये अडकलेल्या गाडीलाही तिचे सँडविच झाले, असे म्हणू लागलो. दोन व्यक्तींमधील वाद सोडविण्यासाठी गेलेलाही म्हणून जातो, 'तुमच्या भांडणात माझे सँडविच झाले आहे.' हे सारे असले, तरी सँडविच हे इंग्लंडमधील एका शहराचे नाव आहे. या शहराशी संबंधित दोन गोष्टींमुळेच सँडविच तयार झाले, असे सांगतात.

पहिली घटना अशी, सँडविच या शहरात पत्ते खेळणारा एक मनुष्य होता. पत्ते खेळता खेळता त्याला खायला आवडायचे; पण पत्त्याचा शौक एवढा होता, की त्याला बसून जेवायला वेळ पुरत नसे. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. या माणसाला एका हाताने खाता येईल आणि हात खराब होणार नाहीत, अशा पदार्थाची गरज होती. त्याने ब्रेडवर चिरलेल्या भाज्या ठेवल्या, त्याला चव यावी म्हणून वरून टोमॅटो सॉस घातला. हे सर्व जिन्नस खाली पडू नयेत म्हणून त्यावर ब्रेडचा दुसरा तुकडा ठेवला. यानंतर त्याचे पत्ते खेळणे आणि जेवणे एकत्रच होऊ लागले. या पदार्थाला काय नाव द्यावे, असा प्रश्न पडला, तेव्हा त्याने सरळ आपल्या शहराचे नाव देऊन टाकले.

अशीच दुसरी एक दंतकथा वाचनात आली होती. सँडविच या शहरातील एक मनुष्य जवळच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून थकला. त्याला भूक लागली होती. धावत बाजारात गेला; पण सगळी रेस्टॉरंट बंद झाली होती. एक रेस्टॉरंट बंद होताना त्याला दिसले. त्याने त्या मालकाला विनंती केली, की काहीतरी खायला द्यावे. काहीच शिल्लक नसल्याचे मालकाने सांगितले. शेवटी, 'पावाचा तुकडा तरी असेल तर द्या,' असे तो माणूस कळवळून म्हटला. फक्त पावाचा तुकडा कसा देणार, असे वाटून रेस्टॉरंट मालकाने मांसाचे भाजलेले दोन-तीन तुकडे टाकून पाव दिला. त्या व्यक्तीने तो पाव तसा खाल्ला. त्याला त्याची चव आवडली. दुसऱ्या दिवशी त्याचे त्याच शहरात काम होते. काम झाल्यानंतर तो त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. 'कालच्यासारखाच पदार्थ बनवून द्या,' असे त्याने मालकाला सांगितले. मालकालाही कौतुक वाटले. त्याने आनंदाने पावामध्ये मांसाचा तुकडा भरला, त्याला चव यावी म्हणून कच्चे टोमॅटो, कांदा, काही चटण्या आणि सॅडल भरून त्याला दिले. त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा तो पदार्थ अधिक चविष्ट लागला. बिल देताना मालकाने त्याला तो कोठून आला, असे विचारले. त्याने सँडविच या शहराचे नाव सांगितले. पुन्हा दोन-तीन दिवसांनी तो मनुष्य त्या शहरात आला असता त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याने तोच पदार्थ मागितला. मालकाने हसत हसत तो बनवून दिला आणि देताना सांगितले, 'तुम्ही गेल्यानंतर हा पदार्थ आम्ही बऱ्याच लोकांना दिला. त्यांना तो आवडला. आम्ही कौतुकाने तुमच्या शहराचे नाव त्याला दिले.' अशा प्रकारे सँडविचचा जन्म झाला.

कालांतराने लोकांनी सँडविचवर वेगवेगळे प्रयोग केले. त्यात लोणी आणि चीज आले. वेगवेगळ्या भाज्या, मांस अशा प्रकारचे जिन्नस टाकून त्याची चव वाढविण्यात आली. काही लोकांनी हे सर्व जिन्नस ब्रेडमध्ये घालून भाजले आणि 'ग्रील सँडविच' नावाचा वेगळा आविष्कार पुढे आला. नंतर त्याला समांतर अशा बऱ्याच पदार्थांची निर्मिती होऊ लागली. १७६०च्या दरम्यान बर्गरची निर्मिती झाली, असे म्हणतात. पुढे १९५५ सालानंतर मॅकडोनाल्डच्या प्रयत्नांनी ते लोकप्रिय झाले. साधारण १० वर्षांनंतर म्हणजे १९६५मध्ये 'सब वे सँडविच' नावाचा प्रकार सुरू झाला. त्यामध्ये लांबट अशा पावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, आपल्या आवडीचे सॉसेज, भाज्या, मांस घालून सँडविच आले. आता तर जगभरात नाश्ता किंवा जेवणाला सँडविच मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. काठीरोल हा यातीलच एक प्रकार म्हणता येईल. मी म्हणेन, की लोणचे आणि पोळीचा रोल हादेखील सँडविचचा एक प्रकार आहे. याबरोबर सँडविच ढोकळा, सँडविच मिठाई अशा पदार्थांची नावेही घेता येतील.

इंडियन कॉटेज सँडविचचा शोध मी लावला. भाकरी मधून कापून आतमध्ये हिरवी चटणी आणि लोणी लावायचे. मधे कांद्याच्या चकत्या आणि झुणका भरून खायला द्यायचे, म्हणजे हे सँडविच. तर अशी ही सँडविचची गोष्ट. पुढे कशी वाढत याईल, हे मी आत्ता सांगू शकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दि शेप ऑफ वॉटरखोल, गहिरं, गूढ...

$
0
0

स्वरयंत्र काढून टाकलेली झेल्टा आणि प्रयोगशाळेत असलेला जयलक्ष यांच्यामध्ये फुलणाऱ्या नात्याची ही कथा. दोघेही बोलत नाहीत; पण त्यांना परस्परांची भाषा समजते. त्याच्यासाठी ती मोठे धाडस करते. त्याच्यामध्ये गुंतत जाते आणि शेवटी वेळ येते विरहाची.

- प्रसाद नामजोशी

स्वरयंत्र काढून टाकल्याच्या खुणा तिच्या मानेवर अजूनही आहेत. त्या बघून एखाद्या माशाच्या मानेवर असणाऱ्या कल्ल्यांची आठवण होते. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून एकदा त्यावरून हात फिरवायची तिला सवय आहे. तशा तिला अनेक सवयी आहेत. रोज सकाळी अलार्मच्या आवाजाने उठायचे, टबमध्ये अंघोळीसाठी पाणी सोडायचे, कॅलेंडरचे पान फाडायचे, अंडी उकडायला ठेवायची आणि पाणी उकळण्याचा तो आवाज सुरू झाला, की टबमध्ये बसायचे. आत्ममग्न व्हायचे. पाण्याच्या अनेकरंगी नादांतून एलायझाचा दिवस सुरू होतो. तिच्या आयुष्यात शब्द नाहीत. नाद मात्र आहेत.

एलायझा एका शासकीय प्रयोगशाळेत सफाई कर्मचारी आहे. तेथे तिला समजून घेणारी, तिच्याशी संवाद साधू शकणारी झेल्टा आहे. अनुभवी, उत्साही झेल्टा एलायझाची जवळची मैत्रीण आहे. शेजारी राहणारा गिल्स हा चित्रकार. गिल्स एकटा आहे, त्याला फारसे काम नाही. तोही एलायझाला समजून घेऊ शकतो.

अर्थात, एलायझाला काय हवे आहे, हे तोवर कोणाला समजत नाही, जोवर तिच्या त्या प्रयोगशाळेत संशोधनासाठी म्हणून चक्क एक मेल-मर्मेड किंवा जलयक्ष दाखल होतो. हा जलयक्ष एलायझाला आवडतो. तोही तिच्यासारखाच! जात्याच अबोल. एका काचेच्या पिंपात ठेवले आहे त्याला. तिला बोलता येत नाही, त्यालाही नाही; पण तरी कळते भाषा सहवेदनेची. सह-अनुभूतीची. सहानुभूती नव्हे.

त्या दोघांनाही न आवडणारी आणखी एक गोष्ट तेथे समान आहे, स्ट्रिकलँड. जलयक्षावर लक्ष ठेवायला आलेला हा अत्यंत उर्मट असा सरकारी अधिकारी आहे. आपल्या हातातल्या रॉडने त्या जलचर जिवाला सतत शॉक देऊन, त्याची अवहेलना करणे त्याला अतिशय आवडते. त्या भानगडीत त्याने त्याची दोन बोटेही गमावली आहेत आणि म्हणून जलयक्षाचा अधिकाधिक राग करणे सुरू आहे. आता त्याची नजर आहे एलायझावर. तिचा मूकपणा त्याला आकर्षित करू लागलेला आहे. माझ्याबरोबर राहशील, तर तोंडाने थोडा फार आवाज काढू शकशील, हे त्याने तिला सरळसरळ आव्हान दिलेले आहे. घरी गेल्यावर पत्नीसमवेत एकांतात तिची बडबड त्याला असह्य होते. 'गप्प बस, शांतता हवी आहे मला,' तो सांगतो. पत्नीबरोबर रत होतानाही त्याच्या कल्पनेत एलायझाच असणार.

एलायझाला याची कल्पना असण्याचे कारण नाही. तिला बिचारीला तर आपल्याला आवडू लागलेल्या जलयक्षावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात रस्सीखेच सुरू झालेली आहे, हेसुद्धा माहिती नाही. दिवस साठच्या दशकातले. शीतयुद्धाचे. रशियाने एका कुत्रीला अंतराळात पाठवून अमेरिकेवर आघाडी घेतलेली आहे. आता त्यांना या जलयक्षाला अंतराळात पाठवायचे आहे. त्याची माहिती पुरवणारा त्यांचा कॉम्रेड आहे त्या प्रयोगशाळेतला शास्त्रज्ञ डॉक्टर रॉबर्ट. म्हणजे एकीकडे रशिया, दुसरीकडे अमेरिका आणि मधे जलयक्षाच्या प्रेमात पडलेली, मूक एलायझा.

अचानक प्रयोगशाळेत काही हालचाली घडू लागतात. अमेरिकन सैन्याचे जनरल हॉइट तेथे येतात. या प्राण्याचे काय करायचे याची चर्चा सुरू होते. रशियाला तो मिळू द्यायचा नाही. वास्तविक तो जीव संगीताला प्रतिसाद देऊ शकतो, ही महत्त्वाची माहिती रॉबर्टनेच रशियाला एव्हाना पुरवली आहे; पण तो शास्त्रज्ञही आहेच. त्यामुळे त्या जिवाला पाण्यात टाकायला हवे, त्याला तुम्ही मारून टाकू शकत नाही, हे तो कळवळून जनरल हॉइटना सांगतो. त्यावर जनरल त्याला सांगतात, 'तुला काय म्हणायचे आहे ते मी ऐकून घेईन; पण मी काय करायचे ते तू मला नाही सांगायचेस बरे बाळा!' एलायझा हे सगळे चोरून ऐकते आहे.

तिला धक्का बसला आहे. रॉबर्ट काही करू शकत नाही. ती आता गिल्सला जलयक्षाला तेथून बाहेर काढण्याविषयी सांगू लागते. हे सांगताना ती अॅग्रेसिव्ह झालेली आहे. ती म्हणते तो जेव्हा माझ्याकडे बघतो, तेव्हा माझ्यात काहीतरी कमी आहे, असे त्याला वाटत नाही. आपल्याला आहे तसेच बघणारा तो एकच जीव अस्तित्वात आहे, याची तिला खात्री आहे.

आता जलयक्षाला वाचवायचा प्रयत्न दोन जण करत आहेत. एलायझा आणि डॉक्टर रॉबर्ट. रॉबर्ट पुन्हा आपल्या रशियन कॉम्रेडला भेटतो आणि 'त्या'ला वाचवायचा प्रयत्न करू, असे सांगतो. रशियाकडूनही 'त्या'ला मारून टाकायचा सल्ला दिला जातो. रॉबर्ट नकार देतो. मी देशभक्त आहे, तसा शास्त्रज्ञही आहे, मला शिकायचे आहे, हा त्याचा मुद्दा. त्यावर त्याला उत्तर मिळते, की आपल्याला काही शिकायची गरज नाही. अमेरिकेने नसत्या गोष्टी शिकायला नकोत, हे महत्त्वाचे. त्यांचा मुद्दा सरळ आहे.

शेवटी एलायझाचा मुद्दा गिल्सला पटतो आणि तो तिच्या प्लॅनमध्ये सहभागी होतो. शासकीय प्रयोगशाळेतून अभ्यासासाठी आणलेल्या अत्यंत सुरक्षित अशा जलयक्षाला पळवायची योजना. एलायझाच्या त्या योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रत्यक्ष पळवण्याच्या तिच्या प्रयत्नात अनेक गोष्टी आडव्या येतात; पण एलायझाच्या मागावर असलेल्या झेल्टाची, तो जीव वाचवायची आटोकाट इच्छा असलेल्या रॉबर्टची ऐनवेळी मदत होते आणि एलायझाच्या घरातल्या टबमध्ये जलयक्ष विराजमान होतो. पाऊस सुरू होऊन कालवा भरण्याचा दिवस ती कॅलेंडरवर नोंदवून ठेवते. त्या दिवशी त्याला कालव्यात सोडायचे, असे तिचे ठरलेले आहे.

दुसऱ्या दिवशी झेल्टा आणि एलायझा नेहमीप्रमाणे कामावर जातात. जलयक्ष गायब झाल्याप्रकरणी चौकशा सुरू आहेत. स्ट्रिकलँड दोघींना बोलावून घेतो. दोघीही हात वर करतात. एलायझाकडे मात्र आता डोळे वटारून बघण्याची हिंमत स्ट्रिकलँडला होत नाही. तुमच्याकडून काय माहिती मिळणार? लोकांची घाण साफ करणारे कर्मचारी तुम्ही, असा अकारण शेरा तो मारून त्यांना जायला सांगतो. झेल्टा सुटकेचा निश्वास टाकून बाहेर जाते. एलायझा मात्र स्ट्रिकलँडच्या डोळ्याला डोळा भिडवून खाणाखुणा करते. त्याला अर्थ कळत नाही. झेल्टाला कळला आहे; पण ती वेळ मारून नेते. स्ट्रिकलँडच्या तोंडावर त्याचा उद्धार करण्याचे धैर्य एलायझाला आलेले आहे. एकप्रकारे स्ट्रिकलँडनेच ते बहाल केले आहे. शत्रूच्या तेजाने स्वत:ला समृद्ध करत जाणाऱ्या एखाद्या परीकथेतल्या गोष्टीप्रमाणे एलायझामध्ये हे परिवर्तन झालेले आहे.

एलायझाच्या घरी जलयक्ष हळूहळू काही गोष्टी समजू लागलेला आहे. एलायझाच्या स्पर्शाचे अर्थ तो लावू लागलेला आहे. एकदा तोही तिला स्पर्श करतो, एलायझा शहारते; पण सावरतेही. काळ काही प्रहरांचा जावा लागतो; पण एका नव्या अनुभवाला ती सामोरी जाते. दुसऱ्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याचा अर्थ झेल्टाला लक्षात येऊ लागतो. सगळे कळल्यावर ती म्हणते, 'बाई, कुठल्या का असेना; पण शेवटी पुरुषावर विश्वास ठेऊ नये हेच खरे!'

एलायझाला आता प्रणयाचे नवे नवे खेळ सुचू लागलेले आहेत. आता ती त्याचा आणि आपला एकत्र विचार करू लागलेली आहे. दोघांना एक टब पुरणार नाही, म्हणून ती संपूर्ण बाथरूम पाण्याने भरते. पाणी बाहेर गळू लागते. आता ते कधी नव्हे ते चार प्रेक्षक लाभलेल्या खालच्या थिएटरमध्येसुद्धा टपकू लागलेले आहे. शेजारचा गिल्स पळत पळत तिच्या घरात जातो आणि अखंड धारा बाहेर पडत असलेल्या बाथरूमचे दार खेचतो. पाण्याचा प्रवाह मोकळा होतो आणि जलयक्षाच्या मिठीत असलेल्या अत्यंत समाधानी एलायझाला तो बघतो!

आता पाऊस सुरू झालेला आहे, कालवा भरत आला आहे. एलायझाचे मन जड झालेले आहे.

तिकडे स्ट्रिकलँड रॉबर्टवर नजर ठेवून आहे. त्यामुळे त्याला रशियन एजंट कडून गोळ्या घातल्या जातात. मरणासन्न रॉबर्टकडून स्ट्रिकलँड हवी ती माहिती घेतो आणि झेल्टापर्यंत पोचतो. तिचा नवरा घाबरून त्याला असलेली माहिती सांगून टाकतो आणि स्ट्रिकलँड एलायझाच्या घरी पोचतो. आता ती गिल्ससमवेत जलयाक्षाला कालव्यात सोडायला गेलेली आहे. भिंतीवरचं कॅलेंडर हे स्ट्रिकलँडला सांगत फडफडते आहे.

कालवा. विरहाचा प्रसंग. आपल्या दोघांना जाता येणार नाही, तुला एकट्याला जावे लागेल, असे एलायझा जलयक्षाला सांगत असतानाच स्ट्रिकलँड तेथे पोचतो आणि अमानुषपणे गोळ्या चालवतो; पण जलयक्ष उठून उभा राहतो. यक्षच तो, त्याच्या जखमा भरलेल्या आहेत. आता तो एलायझाला घेऊन कालव्यात उडी मारतो. पाण्यात खोल आत तो तिला जवळ घेतो. स्वरयंत्र काढून टाकलेल्या तिच्या मानेवरच्या खुणा आता पाण्यात श्वास घेण्याच्या झडपा होतात. एलायझाचे नवे आयुष्य सुरू होतं. 'दि शेप ऑफ वॉटर' हा चित्रपट अनेक नव्याजुन्या कथांचे संदर्भ एका वेगळ्या पद्धतीच्या सादरीकरणातून आपल्यापुढे मांडतो. एलायझाच्या भावनांना अधिक गहिरे करून एका गूढ पातळीवर खोलवर नेऊन ठेवतो.

दि शेप ऑफ वॉटर (इंग्रजी/ १२३ मिनिटे/ २०१७)

लेखक : गिलेर्मो गेल तोरो, वॅनिसा टेलर

दिग्दर्शक : गिलेर्मो गेल तोरो

कलाकार :

एलायझा- सॅली हॉकिन्स

झेल्टा- ऑक्टॅव्हिया स्पेन्सर

स्ट्रिकलँड- मायकेल शेनॉन

गिल्स- रिचर्ड जेन्किंस

(सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शनासह चार ऑस्कर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसह एकूण तेरा नामांकने)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समजूतदार ‘घरा’मुळेच सर्व काही...

$
0
0

कलाकार असलेला नवरा बाकी कशाहीपेक्षा रियाजाविषयीची चौकशी आधी करतो. सासूबाईंचा आपलेपणा आणि ऐनवेळी जबाबदारी घेण्याची तयारी, तसेच स्वयंपाकासाठी येणाऱ्या अनिता मावशींमुळेही मी घराबाहेर असताना निवांत राहू शकते. अख्खे घरच समजूतदार असल्यामुळे मी कलाकार म्हणून कायम सकारात्मक राहिले आहे.

- शर्वरी जमेनीस, कथक नृत्य कलाकार- अभिनेत्री

निखिल (फाटक) आणि मी लग्न करायचे ठरवले, तेव्हा दोन्हीही घरी बोललो. दोघांच्याही घरून अर्थातच करिअरसाठी पूर्ण पाठिंबा होता; कारण त्या वेळी मी (म्हणजे आमची बॅच) पंडिता रोहिणीताई (भाटे) जितका वेळ मागतील, तितका वेळ मी रियाजासाठी त्यांना द्यायचे. तेव्हा त्यांची स्थिती अशी होती, की वयानुसार त्यांना काही करता यायचे नाही; पण सुचायचे भरपूर. आम्ही काही शिष्या तर जवळपास सकाळ- संध्याकाळ त्यांच्याबरोबरच असायचो. त्यांना अक्षरश: त्यांची कलाकृती कधी एकदा त्या आमच्यावर उतरवताहेत आणि आम्ही ती त्यांना करून दाखवत आहोत, असेच झालेले असायचे. त्यांचे शरीर साथ देत नसले, तरी रोहिणीताईंना पुष्कळ काही सुचत असल्यामुळे आम्ही तासन् तास त्यांच्याकडेच असायचो. माझ्या तालमीबाबतच्या या गोष्टी सासरीही समजून घेतल्या गेल्या.

आम्ही दोघंही परफॉर्मिंग आर्टिस्ट (तबला वादक आणि कथक नृत्य कलाकार) असल्यामुळे आमचे सादरीकरणांसाठीचे दौरे, कार्यक्रमासाठी उशीरा बाहेर थांबावे लागणे यांसारख्या गोष्टी होतात. हे सासूबाईंना माहिती असूनही, त्यांनी कधीही लग्नानंतर अटकाव केला नाही. कला आणि त्यासाठीचा रियाज समजून घेणे घरातच असल्यामुळे मलाही कधी घराबाहेर असताना अडचण आली नाही. माझ्या रोजच्या रियाजातही बॉडी 'ट्यून' ठेवावी लागते. शरीर हेच नृत्य कलाकाराचे माध्यम असल्यामुळे आवाज, स्टॅमिना, लय- तालाची समज वाढवण्यासाठी, अधिक धारदार करण्यासाठी सततचा रियाज आवश्यक असतो. हा 'क्लासिकल'चा रियाज घरी समजून घेतला गेला. निखिलच्या आई- बाबांना मी भेटायला गेले, तेव्हा त्यांनी 'देवाचे करायला मला आवडते. सणही आम्ही साजरे करतो,' असे सांगितले; पण तूही हे करायलाच हवे, असा आग्रह नाही धरला. माझ्या सुनेला फक्त मी करते, त्याविषयी आदर असावा, इतकीच माझ्या सासूबाईंची माफक अपेक्षा आहे. ती त्यांनी सुरुवातीलाच सांगितली. त्यात काहीच गैर नव्हते. त्यामुळे माझ्या कार्यक्रम किंवा दौऱ्यादरम्यान हे कधी मधे आले नाही, ते करायलाच हवे, अशी जबरदस्ती झाली नाही. मला त्यांच्या श्रद्धांविषयी पूर्ण आदर आहे.

हे सगळे सांगण्याचे कारण एवढेच, की 'फेस्टिव्हल'चा सीझन असतो. तो नृत्य कलाकारांसाठीही चुकलेला नाही. पुणे फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरण आणि इतरही काही कार्यक्रम हे बहुतेक वेळा गणेशोत्सव, नवरात्र या दरम्यानच असतात. मी कार्यक्रमाच्या रियाजासाठी, रंगीत तालमीसाठी आणि प्रत्यक्ष सादरीकरणासाठी जेवढा वेळ देणे आवश्यक आहे, तेवढा देतेच. तो देणे आवश्यक असल्याचे सासरीही समजून घेतले जाते आणि मीसुद्धा जाणीवपूर्वक सण वगैरे घरी साजरे करणे टाळत नाही. जेथे जाणे शक्य आहे, तेथे नक्कीच जाते. हे दोन्हीकडून व्यवस्थित सांभाळले गेल्यामुळेच मी नृत्य कलेसाठी वेळ देऊ शकले आहे.

शार्विलचा जन्म नंतरचा; पण २०११ मध्येच २०१३ मधील दौऱ्यासाठी मला विचारणा झाली होती. तेव्हा मी गरोदर नव्हते आणि आमचा 'चान्स' घ्यायचाही विचार नव्हता. नंतर मात्र मला 'गुडन्यूज' कळल्यानंतर शार्विल चार महिन्यांचा असतानाच आपल्याला दौऱ्यावर जावे लागणार असल्याचे गणित मी मांडले आणि आधी माझ्या 'गायनॅक'कडे धावले. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा हे शहर वसवणारा लँडस्केप आर्किटेक्ट वॉल्टर ग्रिफीन याला समर्पित केलेला 'कॅनबेरा म्युझिक फेस्टिव्हल' होता. त्या दौऱ्याला आधीच 'हो' म्हटल्यामुळे मला तेथे जाणे भाग होते. शार्विल चार महिन्यांचा असूनही मी ऑस्ट्रेलियाला गेले, ते माझ्या गायनॅक आणि आईच्या पाठिंब्यामुळेच; कारण नैसर्गिक प्रसूतीसाठी जाऊनही ऐनवेळी 'सीझेरियन' करावे लागले. एक महिना नीट सांभाळल्यानंतर मी हळूहळू नृत्याचा रियाज सुरूच केला. मी प्रसूतीनंतर दोन महिने आईकडे राहिले. तिसऱ्या महिन्यात मात्र मी शार्विलला घेऊन घरी आले आणि मग आम्ही तिघेच (निखिल, शार्विल आणि मी) होतो. अभिनयाचे अंग मी अक्षरश: त्याला 'फीडिंग' करताना आठवायचे. मग शार्विलला खेळवल्यासारखे करत मी पदन्यास करायचे. त्यामुळे शक्य तेवढ्या पूर्ण तालमीनिशी मी ऑस्ट्रेलियाला गेले आणि चार महिन्यांचा असताना मी जाऊन परफॉर्म करून आले. या दरम्यान मी 'स्काइप', व्हिडिओ कॉल्सवरून उत्तम संवाद साधला. त्या काही दिवसांतही मी घराशी नीट संपर्क ठेवून होते.

मला माझ्यात आणि निखिलमध्ये एक छान गोष्ट वाटते, की कलाकार असल्यामुळे आमची सर्जनशीलताच आम्हाला सतत कार्यरत राहायला शिकवते. ती सकारात्मकताही शिकवते. बायको परफॉर्म करून आली आहे, तर मी त्याला जेवण वाढावे, असे निखिलचे काहीही आग्रह नसतात. दोघांच्याही व्यग्र वेळापत्रकात कोणीही खाण्या-पिण्याचे नखरे करत नाही. काही वेळा तर त्याला चक्क साधा वरण- भातसुद्धा चालतो. त्यामुळे घराबाहेर असताना कधीही आमच्यात जेवण- झोप यांसारख्या गोष्टींवरून कुरबुरी होत नाहीत. उलट तो बाकी कशाहीपेक्षा रियाजाची चौकशी आवर्जून करतो. यात आणखीही मोठा वाटा आहे, तो आमच्याकडे स्वयंपाक करायला येणाऱ्या अनिता मावशींचा. त्या घराचा जवळपास पूर्ण ताबाच घेतात. शार्विलशी तर अतिशय आपलेपणाने वागतात. इतक्या, की तो त्यांना आजीच म्हणतो. मी घर त्यांच्यावर सोडून राहू शकते.

अर्थात, मी मुलाच्या बाबतीत एक मात्र पाळले आहे, की स्वत:चा परफॉर्मन्स असल्याशिवाय मी केवळ दुसऱ्याची कलाकृती पाहायची (अगदी कितीही इच्छा असली, तरीही) टा‌‌ळते. त्यात सिनेमा, नाटक, हॉटेलिंग सगळेच आले. सादरीकरणानंतर काही वेळा जेवण असते. मी तेथूनही शक्यतो पटकन निघते आणि नंतर थांबत नाही. त्यामुळे शार्विलला नीट वेळ देता येतो. तो पूर्ण झोपी जाण्यापूर्वी मी त्याच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते. मुले आपल्या आयुष्यात हरवलेली निरागसता पुन्हा आणतात. ते जीवापाड प्रेम, निष्पाप वागणे का चुकवायचे? मी त्याला हवा तेव्हा पूर्ण वेळ देते; त्यामुळे सासू- सासऱ्यांना आणि आई-बाबांनाही त्यांचा मोकळा वेळ मिळतो.

अर्थात, एकदा एवढे सगळे सांभाळूनही असे झाले होते, की शार्विल आजारी असल्याचे मला माहितीच नव्हते. शनिवार वाड्यावर माझा कार्यक्रम होता. शार्विल आजारी होता. मी कार्यक्रमादरम्यान पुन्हा पुन्हा मेसेज करत होते; तरीही सासूबाईंनी 'तू जा, मी आहे आणि तो अगदी बरा आहे,' असेच सांगितले. मी सादरीकरणादरम्यान काळजी करू नये; म्हणून त्यांनी मला त्याला उलटी झाल्याचे सांगितलेच नाही; पण त्या तातडीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. त्याला काही तासांनी बरे वाटलं. तोपर्यंत मी घरीही आले होते आणि त्यानंतरच मला सासूबाईंनी त्याला उलटी वगैरे झाल्याचे सांगितले. त्या वेळी तर शार्विल फक्त अडीच वर्षांचा होता. मात्र, मी ताण घेऊन कुठलीही गोष्ट करू नये, याचसाठी केवळ सासूबाईंनी इतकी काळजी घेतली. एवढे समजूतदार घर असेल, तरच घराबाहेर राहणे आणि कलाकार म्हणून समृद्ध होण्यासाठी अधिकाधिक कार्यशील असणे शक्य होऊ शकते. मी त्या बाबतीत नशीबवान आहे.

(शब्दांकन : आसावरी चिपळूणकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाबा नावाचा सुपरमॅन

$
0
0

बाबा हा आपल्या आयुष्यात खरेच सुपरमॅन असतो. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर, अवघड वळणांवर तो आपली छाया धरून उभा असतो. कित्येक वेळा कळत-नकळतपणे आपल्याला आधार देत असतो आणि पुढे जाण्यास मदत करत असतो. आपले प्रेम अबोलपणे व्यक्त करणाऱ्या या सुपरहिरोला मनापासून सलाम करायलाच हवा.

भाग्यश्री भोसेकर-बीडकर

हल्ली मातृदिन, पितृदिन, प्रेमदिवस, हा दिवस, तो दिवस, असे सर्व प्रकारचे दिवस साजरे करण्याची समाजमान्य प्रथा आहे. मुळात काही साजरे करायला कारण हवेच असेही नाही, एवढे प्रत्येक दिवशी साजरे करणे सुरू असते. असे जरी असले, तरीही 'पितृदिन नेमका कधी असतो,' असे विचारल्यास बरेच जण गोंधळात पडतील. त्यातल्या बऱ्याच लोकांना मातृदिन कधी असतो, हे माहीत असणार. नाही नाही मातृदिन विरुद्ध पितृदिन किंवा आई विरुद्ध बाबा, असा मुद्दा येथे मांडायचा नाही. निःशंकपणे आई आणि बाबा यांचे आपापल्या जागी स्थान आणि महत्त्व आहे. मातृत्वाला महत्त्व दिले, की पितृत्वाचे महत्त्व कमी होते असेही नाही, तरीही आज येथे आपण बाबा नावाच्या सुपरमॅनविषयी बोलणार आहोत. निमित्त आहे पितृदिनाचे.

सर्वसाधारणपणे जून महिन्यातला तिसरा रविवार हा पितृदिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचा पितृदिन उद्या, म्हणजे १७ जून रोजी आहे. मुळात आई किंवा बाबा यांच्याविषयी कितीही लिहिले, तरी कमीच पडेल असे आहे. याला समुद्रातून लोटाभर पाणी काढण्याची उपमा देता येईल. असे केल्यामुळे समुद्रातील पाणी कमी होत नसते. आपल्यापैकी काही जणांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पाहिले असेल. त्यामध्ये एका लहान मुलाचे वडील दोन दोऱ्यांच्या साहाय्याने आडवे पडले आहेत. त्यांनी आपल्या शरीराचा पूल केला आहे आणि तो मुलगा त्यांच्या अंगावरून दप्तर घेऊन शाळेत चालला आहे. वडील असा पूल होतात, म्हणून अपत्याला समोर येणाऱ्या अडचणींवर मात करता येते, हा त्या व्यंगचित्राचा संदेश. किती खरा आहे हा संदेश! जन्म, मग लहानपण ते किशोर वय ते प्रौढपण या सर्व अवस्थांमध्ये आपल्यासमोर बाबा ही भूमिका वेगवेगळे आकार, वेगवेगळी रूपे घेते. त्यानुसार मनात कोठेतरी बाबा नावाच्या क्षितिजाची व्याख्या अधिकाधिक व्यापक होत जाते. भारतात सुदैवाने बऱ्याचशा मुलांना आई आणि बाबा या दोघांची माया, छत्रछाया अनुभवायला मिळते. पाश्चात्य देशांत घटस्फोटाचे आणि एकेरी पालकत्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तेथील मुले याबाबत भारतीय मुलांएवढी भाग्यवान आहेत, असे नाही.

आपण सुपरमॅन, बॅटमॅन यांचे चित्रपट पाहतो. आपल्या आयुष्यात डोकावल्यास त्या खऱ्या चित्रपटात आपले बाबा सुपरमॅन असतात, हे दिसते. हा सुपरमॅन बऱ्याचदा अव्यक्त असतो. मूल होण्याआधी येऊ घातलेल्या त्या नव्या नात्याचा नवथरपणा अनुभवणारे बाबा, प्रसूतीगृहात आईला कळा येत असताना, त्या कळांच्या वेदना अनुभवणारे बाबा, पुढे बाळाला क्षणोक्षणी जपणारे बाबा, शाळेत जाताना मुलीच्या वेण्या घालायला जमत नसेल, तरी जमेल तशी केशभूषा करून देणारे बाबा, आपल्या बुटाची लेस बांधून देणारे बाबा, ऑफिसमधून उशीरा घरी आल्यावर झोपलेल्या मुलाचा हळूच पापा घेणारे बाबा, कामाच्या ढिगाऱ्यामुळे मुलाच्या शाळेत पालकांच्या सभेला जाता आले नाही म्हणून मनात अपराधी भाव घेऊन फिरणारे बाबा, आपण मोठे होताना, 'स्व' भावना जागृत होत असताना, बेजबाबदारपणे वागताना काही चुका घडल्यास कानउघाडणी करणारे बाबा, तेच घरातील कोणी जास्त बोल लावल्यास जेवणाचे ताट स्वत: घेऊन येणारे बाबा, पाल्याच्या भवितव्यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करणारे बाबा, मुलांच्या यशावर खूष होऊन पार्टी देणारे बाबा आणि अपयश आल्यास मनोबल वाढविणारे बाबा, मुलगी सासरी जाताना डोळ्यातील पाणी लपविणारे बाबा, नातवंडांबरोबर त्यांच्याहीपेक्षा लहान होऊन खेळणारे बाबा, कधी गरज पडल्यास डोक्यावर हात ठेवून 'मी आहे', असा विश्वास देणारे बाबा, अशी कितीतरी रूपे आहेत. ती प्रत्येक वेळी बाबा या शब्दाचा नवीन आयाम दाखविणारी आणि थक्क करून टाकणारी आहेत.

असे म्हणतात, की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो, हे वाक्यही खरे आहे. आजूबाजूचे निरीक्षण केल्यास लक्षात येईल, की यशस्वी स्त्रीमागची ही भूमिका बाबा नावाचा पुरुष निभावतो. उदाहरणच द्यायचे तर खेळ घ्या, अभिनय क्षेत्र घ्या, साहित्य घ्या, विज्ञान घ्या, अगदी आपल्या चौफेर असणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील उदाहरणे देता येतील. मुळात मुलांच्या प्रगतीसाठी, एक माणूस म्हणून विचारांनी परिपक्व बनण्यासाठी सर्वांत महत्त्वाची भूमिका आई-बाबा निभावतात. सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू जिम वॉलवनो आपल्या वडिलांविषयी बोलताना म्हणतो, 'माझ्या वडिलांनी मला जगातील सर्वोत्कृष्ट भेट दिली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला.'

त्यांच्याप्रमाणे अनेक असे वडील आहेत, ज्यांच्या भक्कम आधारामुळे त्यांची मुले आज प्रगतीपथावर घोडदौड करत आहेत. गमतीचा भाग म्हणजे चित्रपटांमध्येही मुले परत येणार असली, की 'गाजर का हलवा' बनविणारी प्रेमळ आई दाखवितात; पण मुलांची तितक्याच आतुरतेने वाट बघणारे वडील अनेकदा दाखविले जात नाहीत. यातील थट्टेचा विषय सोडल्यास काही चित्रपटांत, नाटकांत मात्र बाबा हे पात्र खरेखुरे दाखविले जाते. म्हणूनच नटसम्राटमधील बाबा लेकीला सासरी पाठविताना म्हणतात, 'आमच्या कोकराला सांभाळा.' ते आत्ताच्या 'राझी' या चित्रपटातील वडील आपल्या मुलीला देशप्रेमाचा धडा देतात. म्हणूनच की काय, 'दमलेल्या बाबाची कहाणी' हे संदीप खरे यांनी लिहिलेले गाणे ऐकताना नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.

बाबांची ही अशी अनेक रूपे. घोडचूक केली, की पाठीवर वळ उठेपर्यंत मारणारे बाबाच असतात आणि त्या वळांवर हळद लावणारेही बाबाच असतात. मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाइम करणारे बाबाच असतात आणि मुलीच्या प्रत्येक मित्राची कसून चौकशी करणारे, मुलीवर करडी नजर ठेवणारेही बाबाच असतात. 'अभ्यास करा, शिका, पैसे कमवा, बास झाला बेजबाबदारपणा,' असे म्हणणारे बाबा असतात आणि मुलीच्या लग्नाचा विषय निघाल्यावर विषयाची गाडी इतरत्र वळवून मूळ विषय टाळणारेही बाबाच असतात.

चला, थँक यू हा शब्द अपुरा असला, तरी मनापासून मोठे थँक्स म्हणू या सुपरहिरोला. पितृदिनानिमित्त बाबा नावाच्या बाप माणसाला शुभेच्छा नक्कीच देऊ या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वास्तवदर्शी सिनेमापासून …सिनेमॅटीक भविष्याकडे…

$
0
0

चित्रपट बदलतो आहे, चित्रपटातील स्त्री भूमिका बदलते आहे. कालपर्यंत साहाय्यक म्हणून दिसणारी स्त्री व्यक्तिरेखा आता मध्यवर्ती होते आहे. तिने आपला परीघ विस्तारला आहे आणि त्याला प्रेक्षकांचाही प्रतिसाद लाभतो आहे. कालपर्यंत चित्रपट वास्तवदर्शी होता, या भूमिकांना असाच प्रतिसाद लाभत राहिल्यास भविष्य सिनेमॅटीक होईल.

अंबर हडप

वर्ष होते १९५३. अवघ्या महाराष्ट्रात जेवढा सरासरी पाऊस झाला असेल, त्यापेक्षा जास्त पाणी त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा डोळ्यातून वाहिले असेल; कारण त्या वर्षी शामची आर्इ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मग त्यानंतर हा ओघ काही थांबला नाही. दरवर्षी ढगांमधे एकवे‌ळ पाणी जमा झाले नसेल; पण मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यांतून धो धो पाऊस पडला. स्त्रियांवर झालेल्या अन्यायावर आधारित चित्रपट एकापाठोपाठ एक येतच राहिले. अर्थात, यालाही काही अपवाद होते, नाही असे नाही; पण बहुतांशी चित्रपटांनी नायिकेला सोशिक दाखवायची जबाबदारी उचलली आणि ती तशी पारही पाडली.

मुळात चित्रपटही पुरुषप्रधान होते. जी अवस्था मराठीची, तीच अवस्था हिंदीची होती. 'कलमुही, …कामचोर कहींकी' असे म्हणून ललीता पवार आणि तत्सम सासवांनी असंख्य सुनांना छळामध्ये काहीही बदल न करता छळले आणि प्राण,‚ जीवन, प्रेम चोप्रा अशी सकारात्मक नावे असणाऱ्या खलनायकांनी स्त्रियांवर अनंत अत्याचार केले.

असे म्हणतात, की चित्रपट हा समाजाचा एक आरसा असतो. मग तेव्हाचा समाज आणि समाजातील स्त्रिया अशा टिपिकल सोशीक होत्या का? तर अजिबात नाही. तेव्हा कशाला,Æ इतिहासातदेखील बंडखोर स्त्रियांचे अनेक दाखले मिळतील. तसे काही धाडसी निर्मात्यांनी प्रयत्नही केले; पण प्रेक्षकांना नायिकेच्या डोळ्यात विखार नाही, पावसाळाच हवा होता, त्याला कोण काय करणार. चित्रपट आधी वास्तववादी होताच; पण तो वास्तववादी सिनेमा लोकांना आवडायला लागला आणि एक महत्त्वाचा बदल झाला. तो म्हणजे, नायिका बदलायला लागली किंवा नायिकेतील बदल लोकांना आवडायला लागला. पूर्वी सोसणाऱ्या नायिकेने हातात आसूड घेतला, की प्रेक्षकांना तो चित्रपट आवडायचा; कारण प्रेक्षकवर्गातील असंख्य महिलांना भोगणारी महिला बंड करताना दिसायची आणि स्फूर्ती मिळायची. महिलांच्या सशक्त व्यक्तिरेखा 'मदर इंडिया', 'मिर्च मसाला', '‚खूबसूरत', '‚खून भरी मांग' अशा चित्रपटांत लिहिल्या गेल्या. अगदी 'मुघल ए आजम'मधील अनारकलीदेखील बादशहासमोर 'प्यार किया तो डरना क्या' असा प्रश्न विचारताना आपण पाहिली.

काळ बदलत गेला आणि शिक्षणामुळे मुलींच्या कक्षा रुंदावायला लागल्या. सोसणारी, ‚रडणारी, ‚भोगणारी,‚ चूल आणि मूल सांभाळणारी हिरॉइन इतिहास जमा होऊ लागली. नंतर आलेल्या काळामध्ये स्त्रीचे नवे चित्र समोर आले. त्या चित्राचे नाव होते प्रेयसी किंवा …गर्लफ्रेंड. त्यानंतर समाजाचे भान बाळगून चित्रपटातील नृत्यमय रोमान्स वाढला. हिरोने मारामारी करावी आणि हिरॉइनने आपल्या अदांनी, सौंदर्याने खिळवून ठेवावे, असा एक दौर आला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक पिढीवर हिरो नावाच्या राजाने राज्य केले. देवानंद, मग राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चन आणि मग शहारूख खान आणि आता रणबीर कपूर, ‚सलमान खान,‚ आमीर खान. पटकथा अशा पद्धतीने लिहिल्याच जाऊ लागल्या, की चित्रपट हिरोभोवती फिरायचा. हिरॉइनचं काम साहाय्यक असायचे. याची अनेक उदाहरणे आहेत. डॉन, दीवार, आनंद आणि असे असंख्य चित्रपट आहेत, ज्यात चित्रपटाची कथा, पटकथा फक्त हिरोभोवती फिरली आहे. लोकही हिरोची मारामारी, हिरोची डायलॉगबाजी, त्याने घेतलेला बदला या गोष्टी बघायला जात होते. हिंदीमध्ये मधुबाला, नर्गिस अशा कितीतरी सक्षक्त अभिनेत्री असूनही अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा वापर चवीपुरताच झाला. अर्थात याला 'सीता और गीता', 'चालबाज' यांच्यासारखा फार कमी वेळा अपवाद होता. हेमा मालिनी, श्रीदेवी, रेखा अशा अभिनेत्रींच्या अभिनय गुणांना डोळ्यासमोर ठेवून असे चित्रपट बांधले गेले. दहा गुंडांना मारणारा फक्त हिरोच नाही, तर हिरॉइनदेखील असू शकते. ती सुद्धा पोलिसी गणवेश घालून गुंडांना यथेच्छ बदडू शकते, यावर लोकांचा विश्वास बसू लागला.

८० आणि ९०च्या दशकात स्त्रीच्या सशक्त व्यक्तिरेखांचे अनेक रंग समोर यायला लागले. 'रुदाली', 'बँडिट क्वीन' हे हिंदीमध्ये, मराठीत 'उंबरठा',‚ 'पिंजरा',‚ 'दोघी', 'मुक्ता' हे समांतर म्हणून नाही, तर व्यावसायिक चित्रपट म्हणून लोकांनी स्वीकारले. यामध्ये फक्त अभिनेत्रींचे कौतुक नाही, तर त्या चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते या साऱ्यांचेच आहे; कारण तद्दन ग्लॅमरस चित्रपट करत असताना, अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना घेऊन, अनेक लेखकांना आव्हानात्मक व्यक्तिरेखा लिहाव्याशा वाटल्या. दिग्दर्शकांना त्या अभिनेत्रींमधील सूप्त टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणावेसे वाटले आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे निर्मात्यांनी या प्रयोगासाठी पैसे लावले. ते झाले नसते, तर डिंपल कपाडियांनी 'रुदाली'मधील बंडखोर रुदाली साकारलीच नसती. ड्रीमगर्ल हेमामालिनी ही सीताची गीता बनलीच नसती. रेखाने 'कामसूत्र', 'आस्था' स्वीकारलाच नसता.

याच काळात स्त्री भूमिकांची आणखी काही रूपे समोर आली. ज्यामध्ये तिने 'मृत्युदंड'मधील केतकी बनून काही प्रस्थापित प्रथा मोडीत काढल्या. 'गुलाब गँग'मध्ये सुमित्रादेवी बनून बंड पुकारले. 'एनएच १०' मधील तिने आपल्या प्रियकराचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान केले, तर 'डोर'मधील गुलपनागने स्वत:च्या नवऱ्याला वाचविण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करत मोठ्या धैर्याने विधवेकडून नवऱ्यासाठी क्लीन चीट मिळवली. 'मर्दानी'मधील शिवानी स्त्री भक्षणाविरुद्ध दबंग इन्स्पेक्टर बनून उभी राहाते. २००० सालानंतर स्त्री भूमिकांना आणखी एक टर्निंग पॉइंट मिळाला; कारण स्त्रीचे प्रश्न घरगुती अन्यायापलीकडे गेले होते. असे प्रश्न मांडण्यापेक्षा चित्रपटांनी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि 'चक दे इंडिया'मधील मुलींनी हॉकीचा वर्ल्डकप खेचून आणला. एक स्पर्धक म्हणून स्त्री कशी आहे, हे प्रकटपणे समजले. 'मेरीकोम' बनून स्त्रीने जगाला प्रेरीत केले. मराठी सिनेमात 'यल्लो'मधील गौरीने जगाला दाखवून दिले, की स्त्री अशीही स्पेशल आहे आणि तशीही. 'क्वीन'मधील रानी एकटी हनीमूनला गेली आणि 'इंग्लीश विंग्लीश'मधील आर्इने मुलीसाठी इंग्लिश भाषेवर प्रभूत्व मिळवले. यातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे 'सैराट'. '…सैराट'मधील आर्ची बंडखोर होती आणि ती वर्णव्यवस्थेविरुद्ध उभी राहीली. तिने प्रेमासाठी वणवा पेटवला.

चूल आणि मूल पासून सुरू झालेल्या स्त्रीचे पाऊल सातच्या आत घरात पडायचे. चित्रपटातील स्त्रीने बंधनांचा उंबरठा ओलांडला. त्यामुळेच ती 'क्वीन' म्हणून गौरवाने उभी राहीली. कधी गौरी बनून ती स्पेशल ठरली, तर कधी स्त्रीच्या पाठी उभी राहून तिचीच 'सिक्रेट सुपरस्टार' बनली. 'तुम्हारी सुलू' बनून तिने टिपिकल गृहिणीला लोकांच्या मनापर्यंत नेत संवाद साधला. चित्रपट मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो वा कुठल्याही देशाचा, स्त्री भूमिका बॉक्स ऑफिसवर आणि मनावर राज्य करायला लागली आहे. चित्रपट हा कितीही झाला, तरी मेक बिलिव्हचा खेळ असतो, असे म्हणतात. काल समाजातील गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात दिसत होते. तेथून आज चित्रपटातली स्त्री आणि तिची भूमिका, तिची हिंमत समाजातील स्त्रियांना प्रेरीत करायला लागली आहे. हे असेच चालू राहिले, तर काल चित्रपट वास्तवदर्शी झाला होता…. सशक्त स्त्री व्यक्तीरेखांमुळे भविष्य सिनेमॅटीक होण्यास वेळ लागणार नाही.

(लेखक चित्रपट, नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढणं एक कला

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

'अगं राणी, वाढणाऱ्याच्या उजव्या हाताला मीठ, चटणी, कोशिंबीर वाढायचं असतं. लग्नाला तीन वर्षं झाली तरी पान काही वाढता येत नाही अजून,'हा संवाद आपल्याही सवयीचा. सुगरण असणाऱ्या अनेकींची ताट वाढताना गडबड होते. मग भाजीचा रस्सा चटणीत आणि वरणामध्ये भिजलेले पापड, या गोष्टी अगदी ठरलेल्या. याच गोष्टी टाळण्यासाठी या खास टिप्स...

काय करायचं आणि काय टाळायचं?

जेवायला बसल्यावर सगळ्यांत आधी लक्ष वाढलेल्या ताटाकडे जातं. स्वयंपाक ही एक कला आहे, असं म्हणतात; पण पोट आणि मन दोन्ही भरण्यासाठी ते पुरेसं नक्कीच नाही. ताट वाढण्याची पद्धत आणि सुटसुटीत टेबल यामुळे तुमचं जेवण अधिक रुचकर होऊ शकतं. पाहुण्यांच्या ते कायम लक्षात राहू शकते. पदार्थ कितीही उत्तम चवीचे असले, तरी ताटात गर्दी झालेली असली आणि पदार्थ एकमेकांत मिसळले असतील, तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. घरी जेवत असा किंवा हॉटेलमध्ये, वाढण्याची पद्धत ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यामुळे पाहुण्यांना आणि खरंतर तुमच्या कुटुंबीयांनासुद्धा वाढताना काही गोष्टी कायमच लक्षात ठेवायला हव्यात.

हे विसरून चालणार नाही.

पाणी हा अगदी न टाळण्यासारखा भाग आहे; त्यामुळे सगळ्यांत आधी ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना जेवण्याआधी एक घोटभर पाणी पिण्याची सवय असते. पाण्यालाही चव आणण्यासाठी त्यात जरासं लिंबू आणि पुदिना टाकता येईल. त्यामुळे पाण्याला वेगळी चव मिळेल आणि जेवण पचण्यासाठीही मदत होईल.

अतिथी देवो भव!

अतिथीचं स्वागत करणं, त्यांना सन्मान देणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य समजलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम जेवण वाढून संतुष्ट करणं, ही महत्त्वाची गोष्ट ठरते. आलेल्या पाहुण्यांना आरामशीर आणि पोटभर जेवता आलं, की ते एकंदरच खूष होतात. जेवणाच्या चवीबरोबरच तुम्ही केलेलं आतिथ्यही ते विसरणार नाहीत.

लक्ष वेधणारी कटलरी

जे पदार्थ करत आहात, त्याला योग्य आणि आवश्यक अशी कटलरीची मांडणी हवी. कटलरीला जुनी परंपरा लाभली आहे. ती एक संस्कृतीच बनून गेली आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

पदार्थांची योग्य मांडणी

तुम्ही तयार केलेले रुचकर पदार्थ योग्य रीतीनं वाढलेत, तर त्याची चव आणखी वाढते. प्रत्येक पदार्थाची वेगळी मांडणी, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. सूप बाउल्सपासून गोडाच्या वाट्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळ्या समोर आल्यास पाहुण्यांसाठी तो नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

पसारा नको

जास्तीची ताटं किंवा वाट्यांचा पसारा झाल्यास एखाद्याचा जेवणाचा मूड जाऊ शकतो. त्यामुळे जितके लोक जेवणार आहेत, त्यांना आवश्यक तितक्याच गोष्टी मांडून ठेवा.

पदार्थांनुसार क्रोकरीची निवड

चुकीचे पदार्थ चुकीच्या ताटांमध्ये किंवा वाट्यांमध्ये वाढले, तर कसं वाटेल? नूडल्स खाताना साधा चमचा आणि आइस्क्रीम खाताना काटा-चमचा, असं असल्यास कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे जे पदार्थ करणार आहात, त्यानुसार क्रोकरीची मांडणी हवी. केलेले पदार्थ खाण्यासाठी योग्य अशा गोष्टी असल्या, तर जेवणाचा आनंद वाढतो.

बच्चेकंपनी खूष होईल

तुम्ही वाढदिवस किंवा लहान मुलांच्या कार्यक्रमांसाठी पार्टीचं आयोजन करत असाल, तर नक्कीच त्यांना खूष करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना आवडणारे गडद आणि गोंडस, आकर्षक असे रंग क्रोकरीसाठी निवडा. याचसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या रंगांचा, कार्टून्सचा उपयोग या मांडणीमध्ये करता येईल. एकदा मन खूष झालं, की पोट भरायला वेळ लागत नाही.

पदार्थांची सजावट विसरू नका

प्रत्येक पदार्थ हा कसा लागतो, याचसोबत तो कसा दिसतो, हेदेखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक पदार्थाची सजावट विशिष्ट पद्धतीनं करता येते. डोळ्यांना सुंदर दिसणारे पदार्थ चवीबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. त्यामुळे कोणतेही पदार्थ बनवताना त्यांना चविष्ट आणि देखणं बनवायचं आहे, हे लक्षात घ्या.

टिशू आणि नॅपकिन तितकेच गरजेचे

पदार्थांची चव, सजावट याचसोबत जेवणाचा एकंदर अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. केवळ रुचकर पदार्थ पानात वाढून चालत नाही, तर टेबलाची साधीच; पण साजेशी सजावट देखील गरजेची असते. याबरोबर योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात टिशू पेपर्स आणि नॅपकिन्स ठेवल्यास गडबडीच्या वेळाही टाळता येऊ शकतात.

संकलन : अनुजा मुळे,

कॉलेज क्लब रिपोर्टर, आय.एल.एस.लॉ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>