Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

होऊ दे मिसआऊट

$
0
0

'जॉय ऑफ मिसिंग आऊट'बद्दल तुम्हाला माहितीय का? सोशल मीडियावर सतत कनेक्टेड असण्याच्या आजच्या जमान्यात, त्यापासून काही काळ ठरवून लांब राहण्याचा हा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. त्याविषयी...

शब्दुली कुलकर्णी

गार्गीची (नाव बदललं आहे) परीक्षा संपली. त्यानंतर, सुट्टीत भरपूर मोकळा वेळ असल्यानं फेसबुकवर सतत पोस्ट करणं, लाइक्स-कमेंट्स बघत राहणं, व्हॉटसअॅपवर चॅटिंग करणं अशी सवय तिला लागली. रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन राहू लागली. नंतर मात्र तिला या गोष्टींमुळे त्रास होऊ लागला. सोशल मीडियाच्या अतिवापराचं आरोग्यावर परिणाम होऊ लागले. अखेर यातून बाहेर पडण्यासाठी दिवसातले काही तास मोबाइल न वापरण्याचा नियम तिनं करून घेतला. त्या वेळेत मोकळ्या हवेत फिरायला जाणं, पुस्तक वाचणं किंवा एखादा छंद जोपासणं हे ती करू लागली. या दरम्यान सोशल मीडियावर काय चालू आहे? कोणी काय पोस्ट केली? तिनं टाकलेल्या फोटोवर कुणी काय कमेंट केल्यात? त्याला किती लाइक्स मिळाले, या सगळ्या गोष्टींना तिनं महत्त्व द्यायचं नाही असं ठरवलं. सोशल मीडियापासून काही काळ ठरवून दूर राहणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढलं असून, या ट्रेंडला 'जॉय ऑफ मिसिंग आऊट' असं म्हटलं जातंय.

आजकाल सतत ऑनलाइन असण्याचा तरुणाईचा अट्टाहास असतो. आपल्या पोस्टवर कोण किती लाइक्स किंवा कमेंट करतं किंवा एखाद्या मैत्रीणीनं काही महत्त्वाचं पोस्ट केलं तर ते माझं बघायचं राहून जाईल, अशी भीती अनेकांना वाटत असते. यालाच फिअर ऑफ मिसिंग आऊट असं म्हटलं जातं. याच्याच विरुद्ध ट्रेंड म्हणजे 'जॉय ऑफ मिसिंग आऊट', अर्थात 'जोमो'. सोशल मीडियापासून दूर राहून स्वत:साठी वेळ दिला जातो. हा ट्रेंड फॉलो करण्याचं प्रमाण वाढतंय.

काय केलं जातं?

- काही ठराविक दिवसांसाठी सोशल मीडियाची अॅप्स मोबाइलमधून काढून टाकली जातात.

- काही दिवसांसाठी इंटरनेट किंवा वायफाय बंद करुन टाकलं जातं.

- काही दिवसांसाठी मोबाइल, लॅपटॉप किंवा इतर कोणतंही गॅजेट वापरलं जात नाही.

- कित्येकजण सोशल मीडियावरील अकाऊंट्स काही काळासाठी बंद करतात.

फायदे काय?

- छंद जोपासायला वेळ मिळतो.

- ताण हलका होतो.

- सर्जनशीलता वाढते

- कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं नातेसंबंध घट्ट होतात.

- स्वत:साठी वेळ मिळतो.

- मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं.

००००

सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपलं आयुष्य अधिकच सोशल झालंय. आपलं वैयक्तिक असं काही राहिलेलं नाही. त्यावर नियंत्रण आणणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण स्वत:ला वेळ दिला पाहिजे. आपला आतला आवाज ऐकला पाहिजे. 'जोमो'मध्ये नेमकं हेच केलं जातं. मानसिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं हे चांगलं आहे.

डॉ. अनुप भारती, मानसोपचारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>