Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

एक पत्र

$
0
0

धागा धागा विणते नवा

लहानपणी रक्षाबंधन म्हणजे, मी दादाला राखी बांधणार आणि तो माझ्यासाठी काहीतरी गंमत घेऊन येणार हा जणू करारच आहे असं वाटायचं. दादा माझ्यासाठी कुठली गंमत आणतोय या कुतुहलापोटी मी दरवर्षी त्याला राखी बांधायचे. घरच्यांनीही लहानपणीची ती निरागस समजूत तशीच ठेवली. मला नेहमी प्रश्न पडायचा, की रक्षाबंधनाच्या दिवशी मी फक्त दादालाच राखी का बांधायची? आई आहे, बाबा आहे, आत्या आहे. हे सगळेसुद्धा माझ्यासाठी गंमत आणतातच की. पण, दादाकडून जे मिळतंय तेही हातचं जाईल असं वाटून मी कधी कुणाला विचारलं नाही.

आमची वयं वाढली, व्याप वाढले आणि आमच्या नकळत रक्षाबंधनाचा आमचा तो 'करार' कधी मोडला हे कळलंच नाही. बऱ्याच दिवसांनी जुने फोटे बघताना माझा आणि दादाचा राखी बांधतानाचा तो फोटो दिसला आणि जुन्या आठवणींनी हसू आलं. एकीकडे लहानपणीची ती मजा आता नाही याचं वाईटही वाटत होतं. आता रक्षाबंधनाचा अर्थ लक्षात आला होता. 'बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या प्रेमापोटी तिचं सदैव रक्षण करण्याचं वचन देतो. बहिण-भावाच्या नात्यातलं पवित्र बंधन म्हणजे रक्षाबंधन' अशा छान शब्दांत निबंधही लिहून झाला होता.

त्या दिवशी तो फोटो बघताना हे सगळं आठवलं आणि मी ठरवलं की एक नियम किंवा प्रथा म्हणून रक्षाबंधनाला सीमित का ठेवायचं? भाऊच बहिणीचं रक्षण करणार असंच का बरं? रक्षण करण्याचं वचन तर कोणालाही देऊ शकतो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट असतेच जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. स्वत:पेक्षाही त्या गोष्टीला जपतो आपण. मग ती माणसं असोत किंवा वस्तू किंवा निसर्ग. ज्यांच्यामुळे आपण आनंदी राहतो, ज्यांच्यासाठी आपण जगतो, ज्यांच्यामुळे जगतो त्यांना राखी बांधून हे प्रेम वाढवलं तर? असा विचार मनाला शिवून गेला. त्या एका विचारानंच केवढी खुलले मी! घरात आई-बाबांना राखी बांधली, दारातल्या तुळशीला, घरातल्या माऊंना, कामाला येणाऱ्या मामांना राखी बांधून त्या सगळ्यांनाही प्रेमानं बांधलं होतं. माझा मलाच आनंद झाला. पण काहीतरी महत्त्वाचं राहीलंय असं सारखं वाटत होतं.

इतक्या सगळ्यांना राखी बांधली मग काय राहीलंय? ह्या विचारातच खोलीत आले. रियाझाला बसायचं म्हणून तानपुरा हातात घेतला. मग, अचानक जाणवलं ती खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा तानपुराच तर आहे. जो माझ्या सुरांना जपतो, गाणं गाण्याचा आनंद देऊन जातो तो तानपुरा अगदी जिवापाड जपलेला...त्या दिवशी मी माझ्या तानपुऱ्यालाही राखी बांधली. माझ्यातली संगीतकला जपण्याचं, तानपुऱ्यातून उमटणाऱ्या प्रत्येक सुरावर प्रेम करण्याचं, त्यांचं रक्षण करण्याचं वचन मी तानपुऱ्याला दिलं होतं. त्या दिवशी तानपुऱ्याचे सूर अधिक सुरेल वाटले मला आणि माझं गाणंही.

सावनी गोगटे, रुपारेल कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>