Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मिस्टर क्लिन

$
0
0

अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर

मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर गेलं की तिथला कचरा पाहून आपण फक्त हळहळतो आणि घरी येतो. मात्र त्या कचऱ्यानं त्याला अस्वस्थ केलं आणि सुरू झाली किनाऱ्यांची स्वच्छता मोहीम. स्वतः पाय रोवून मिशन स्वच्छतेला सुरुवात करणाऱ्या मुंबईकर जय श्रृंगारपुरेविषयी…

गेलं वर्ष-दोन वर्ष ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा गाजावाजा सुरू आहे. लोकांना त्यातलं गांभीर्य अजूनही फारसं लक्षात येताना दिसत नसलं, तरी जय श्रृंगारपुरे या तरुणानं मात्र स्वच्छतेचा हा मंत्र चांगलाच मनावर घेतला आहे. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर पडलेला कचरा, तिथली अस्वच्छता पाहून तो अस्वस्थ झाला. चौपाट्यांची झालेली दुरावस्था बदलण्याचा चंगच त्यानं बांधला आहे. वर्सोव्यातले वकील अफरोज शहा यांनी राबवलेल्या किनारा स्वच्छतेची माहिती त्याला सोशल मीडियातून मिळाली. त्यातूनच प्रेरणा घेत जयने गेल्या तीन-चार महिन्यांपासून दादर-माहीम-प्रभादेवी लगतच्या समुद्रकिनाराऱ्याची स्वच्छता करण्याचं काम सुरू केलं आहे.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांपैकी बहुतेक जण चौपाटीवर नक्की जात असतात. चौपाटीवर पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, उडणारे कागद, अस्वच्छता, कचऱ्याचा वास हे सगळं विदारक चित्र पाहायला मिळतं. जयला हे चित्र बदलावंसं वाटलं. पर्यावरणाचं होणारं हे नुकसान एक दिवस आपलंच नुकसान करेल हे लक्षात घेऊनच जयने स्वच्छतेचा विडा उचलला.

जयला त्याच्या या उपक्रमात कुटुंबीय आणि मित्रांकडून साथ मिळते. त्याच्या या उपक्रमामुळे दादर चौपाटीलगतचा कचरा काही प्रमाणात कमी झाला आहे. आठवड्यातून दोन-तीन वेळा तो तिथला कचरा उचलतो. शिवाय किनाऱ्यावर पडलेलं प्लास्टिकही गोळा करतो. स्वच्छतेचं हे काम पाहून अनेक स्थानिक मंडळीही जयला मदत करतात. स्वच्छतेची ही मोहीम त्याला अधिक व्यापक करायची आहे.

स्वच्छतेच्या या मोहिमेसाठी जयला नागरिकांचा मदतीचा हात हवा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत त्याला मुंबईकरांना एकत्र आणायचं आहे. लवकरच तो मुंबईतले आणखी काही किनाऱ्यांवरही साफसफाई मोहीम राबवणार आहे. त्याला मुंबईकरांनी त्याला साथ द्यावी, असं आवाहन त्यानं केलं आहे.

काहीही निमित्तानं परदेशात जाणं झालं की तिथली कमालीची स्वच्छता नजरेत भरते. आपल्या मुंबईतही मला अशीच स्वच्छता पाहायची आहे. त्यासाठी मुंबईकरांची साथ मिळणं मात्र आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकानं यात खारीचा वाटा उचलावा.
-जय शृंगारपुरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>